बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

����संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा����

����संतमहिमा����

��यदा यदा ही धर्मस्‍य ग्‍लानीर्भवती भारत ।
धर्मसंस्‍थापनार्थाय संभवामी युगायुगे ॥������

धर्मावर ग्‍लानी येते व पृथ्‍वीवर अधर्म माजतो तेंव्‍हा देव स्‍वत: अवतार घेतात व संतही अवताराला येतात. भगवंताने कृत, त्रेता, द्वापार व कली या चौयुगामध्ये विविध अवतार घेऊन दुष्‍टांचे निर्दळन, भक्‍तांचे पालन व धर्माचे रक्षण केले.मात्र हे करताना देवाला एकटयाला हे शक्‍य नसल्‍याने त्‍याने आपल्‍या सोबत भक्‍तांनाही अवतार घेण्‍याचे सांगीतले आहे. देवाच्‍या कार्याला देव सांगतील त्‍याप्रमाणे संत महात्‍म्‍यांनीही मृत्‍युलोकात अवतार घेतला आहे.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन । हेची करणे आम्‍हा काम बीज वाढवावे नाम ॥
जड जीवांचा उध्‍दार देवाच्‍या नामानेच होतो. त्याना नामाचे महत्‍व कळावे व त्‍यायोगे देवाची अनुभती यावी म्‍हणून संतानी अट्टाहास केला.
करा रे बापांनो साधन हरीचे । झणी करणीचे करु नका ।
जेणे नव्‍हे जन्‍म यमाची यातना । ऐशीया साधना करा काही ॥
नर देहाला आलेल्‍या मनुष्‍य जीवाने देवाची ओळख अर्थात आत्‍मसाक्षात्‍कार करुन घेतला नाही तर मनुष्‍य जन्‍म वाया जाउन पुन्हा जन्‍म-मरणांच्या फे-यात त्‍याला पडावे लागेल.
शेवटची पाळी एक मनुष्‍य जन्‍म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥

������संत मायबाप������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा