मंगळवार, ३१ मे, २०१६

एका वडिलांचं मुलाला पत्र

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||

बघ, वाच, ठरव !
       माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय,
त्याची कारणं तीन. -
1) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अत्यर्र्क्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
2) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
3) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव,
आयुष्यभर!

* माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.

तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

* जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

* आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

* प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

* अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!

* माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.

* आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.

- तूझे वडील

वकील:

हर वकील:एक सत्ता हैं।
उसका कण कण उसकी खुद की कमाई हैं।
उसका सदेव सजग रहना अपडेट रहना आदत और अनिवार्यता है।
वकील सागर से गहरा राजदार हैं।
वकील कर्तव्यनिष्ठ वफादार हैं।
वकील समय की मांग हैं। पीडितो की आस हैं।
वकील समाज के पथ प्रदर्शक हैं ।
वकील चिंतक हैं,सृजक हैं,विश्लेषक हैं ।
वकील सरस्वती का पुत्र हैं।
एसा विश्लेषक की पानी में से तेल निकाल दे।
एसा चिंतक की नया क़ानून रच दे।
एसा जादूगर की रस्सी
को साप और साप को रस्सी बना दे।
उसे सत्य का बोध हैं। और जिसे सत्य का बोध हैं वो बुद्ध हैं।
वकील:कानून का निर्माता,भोक्ता,रक्षक और प्रणेता हैं।
वकील हैं तो न्याय हैं। वह न्यायाधिकारी हैं।
वकील कोर्ट की रोंनक है।
वकील दुखियो का देवता हैं।
ओरो के दुखो को मिटान, अपने दुखो से बेखबर ओरो के लिये दोड़ता समाज सेवक हैं।
हर वकील आत्मविश्वास का साक्षात् अवतार हैं।
उसका सम्मान ही उसकी पुन्जी हैं। उसके पास इसके आलावा देने और खोने को कुछ नही।
हर वकील:एक सत्ता हैं।
उसका कण कण उसकी खुद की कमाई हैं।
उसका सदेव सजग रहना अपडेट रहना आदत और अनिवार्यता है।
वकील सागर से गहरा राजदार हैं।
वकील कर्तव्यनिष्ठ वफादार हैं।
वकील समय की मांग हैं। पीडितो की आस हैं।
वकील समाज के पथ प्रदर्शक हैं ।
वकील चिंतक हैं,सृजक हैं,विश्लेषक हैं ।
वकील सरस्वती का पुत्र हैं।
एसा विश्लेषक की पानी में से तेल निकाल दे।
एसा चिंतक की नया क़ानून रच दे।
एसा जादूगर की रस्सी
को साप और साप को रस्सी बना दे।
उसे सत्य का बोध हैं। और जिसे सत्य का बोध हैं वो बुद्ध हैं।
वकील:कानून का निर्माता,भोक्ता,रक्षक और प्रणेता हैं।
वकील हैं तो न्याय हैं। वह न्यायाधिकारी हैं।
वकील कोर्ट की रोंनक है।
वकील दुखियो का देवता हैं।
ओरो के दुखो को मिटान, अपने दुखो से बेखबर ओरो के लिये दोड़ता समाज सेवक हैं।
हर वकील आत्मविश्वास का साक्षात् अवतार हैं।
उसका सम्मान ही उसकी पुन्जी हैं। उसके पास इसके आलावा देने और खोने को कुछ नही।
वकील समाज की शान हैं। समाज की शान हैं।

लोककल्याणकारी अहिल्याई

लोककल्याणकारी अहिल्याई
 -------------------------

          राष्ट्रमाता अहिल्याईने आपले समस्तआयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना,जाती-धर्माची व प्रदेशाची मर्यादा न घालता, संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. अनेक विहिरी, तलाव, पाणपोई, धर्मशाळा व घाट बांधलेत. रस्ते, पूल निर्माण केलेत.जे काम आज भारताच्या शासनव्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाते तेच काम शेकडो वर्षांपूर्वी राष्ट्रमाता अहिल्याईने केले. ‘प्रजा सुखी तर आपण सुखी,’ असे तत्त्व राष्ट्रमातेने अंगीकारले होते.

           मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थानाची राजधानी ‘महेश्‍वर’ या ठिकाणी आणून उद्योगधंद्याच्या विकासाला प्राधान्य दिले. वस्त्रोद्योग भरभराटीला आणले. वस्त्रोद्योगासाठी विणकर, कोष्टी, हलबा तसेच रस्ते, मशिदी, मंदिरे, धर्मशाळा व इतर बांधकामे सतत चालत असल्यामुळे पाथरवट, वास्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार, सोनार, चर्मकार अशा अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. कलावंत, साहित्यिक व कारागीर अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, घर, पैसा व इतर सर्व सोयी उपलब्ध करून दिल्यात तसेच उद्योगासाठी पैसा आणि माल विकण्यासाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्याने उद्योग व व्यापार भरभराटीला आला. परप्रांतात माल विकला जाऊ लागल्यामुळे इतरत्र मराठी माणसांविषयी प्रेम, आपुलकी व जिव्हाळ्याची भावना वाढीस लागली. आजही भारतात महेश्‍वरी साड्या प्रसिद्ध आहेत.

           काही भूमिहीन असणार्‍या कुणबी, मराठा, तेली, माळी यांसारख्या ओबीसी तसेच दलित, आदिवासी भटक्या, विमुक्त समाजास शेतजमिनी दिल्यात. शेतीच्या जोडीला इतर उद्योग सुरू केले. कृषिप्रधान देश असणार्‍या भारतातील संपूर्ण लोकजीवन पावसावर अवलंबून आहे. बर्‍याच वेळा दुष्काळ पडल्याने त्यांच्या जीवनात त्राही माजते. अशा वेळी भारतात तलाव, विहिरी, घाट व कुंडांची निर्मिती करून लोकांच्या गैरसोयी दूर केल्यात. शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्यावरील करवसुलीची मर्यादा निश्‍चित ठरवून दिली. त्यामुळे जास्त कर वसूल करण्याची शासकीय कर्मचार्‍यांची हिंमत होत नव्हती. म्हणून राष्ट्रमातेच्या संस्थानात अंशत:ही भ्रष्टाचाराला वाव नव्हता.

           रानात चरणार्‍या पशू-पक्ष्यांसाठी रानातच तलाव बांधलेत. शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन पिकांनी भरलेली उभी शेतं खरेदी केलीत आणि पशू-पक्ष्यांना व गायींना चरण्यासाठी सोडलीत. गो-कुरणांचीही व्यवस्था केली. त्या मुंग्यांना साखर आणि मास्यांना कणकेच्या गोळ्या टाकत.शेतात काम करणार्‍या बैलांना पाणी पाजण्यासाठी रोजाने माणसे लावली. केवळ माणसांच्याच नाही, तर पशू-पक्षांच्याही उदरनिर्वाहाची सोय केली. अशा प्रकारे आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहणार नाही, याची सतत दक्षता घेणारी, केवळ समाजाचेच नाही, तर निसर्गातील सजीवांचेही जीवन सुखर करणारी एकमेव राणी अहिल्याई होय!

           गोरगरिबांकरिता औषधोपचारासाठी मोफत दवाखान्याच्या सोयी केल्यात.व्यापार-व्यवसाय आणि दळणवळणासाठी पक्के रस्ते बांधलेत, दीनदुबळे, अनाथ, विधवा, अपंग यांसारख्या असहाय लोकांचे पुनर्वसन केले. त्यांच्यासाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. धर्मशाळा बांधून त्यांची राहण्याची नि:शुल्क व्यवस्था केली.ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. हिवाळ्यात गोरगरीब प्रजेला गरम वस्त्रांचे वाटप केले. बेकारांना काम व श्रमांना योग्य दाम दिलेत. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आमराई, बगिचे निर्माण केले. पर्यावरणाचा समतोल कायम राहावा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा तसेच ओसाड, पडीक जमिनीवर व डोंगरावर झाडे लावून वृक्षरोपणासारखे उपक्रम राबवलेत. पर्यावरणाचा  समतोल राहावा व जमिनीची धूप थांबावी तथा शेतक-यांची आर्थिक  स्थीती सुधारावी यासाठी राज्यातील प्रत्येक शेतक-यांनी २० झाडे लावलीच पाहिजे असा अहिल्याईचा  दंडक होता.  त्यातील ९ झाडे ही शेतक-यांच्या मालकीची असायचीत.  त्यांना या झाडांचा  हवा तसा उपयोग करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य  असायचे.  तर ११ झाडं ही सरकारच्या अर्थात  संस्थानाच्या मालकिची असायचीत.

            अन्नछत्रे, धर्मशाळा, आरोग्यशाळा, पाथशाळा, गोशाळा, वाटसरूंसाठी विश्रांतीकरिता ओटे इत्यादींची बांधकामे केलीत. स्वत: दोनच अपत्यांना जन्म देऊन मर्यादित कुटुंबाचा आदर्श गिरवला. ग्रामपंचायतीची स्थापना, कोतवालपदाची निर्मिती, टपाल व्यवस्था, विनाविलंब न्याय देण्यासाठी न्यायालये, निपुत्रिकांना दत्तक वारसाहक्क, राज्याच्या व प्रजेच्या संरक्षणासाठी पोलिसयंत्रणा, सैन्यव्यवस्था, स्त्रीसैन्य, परराज्यात वकिलांची नेमणूक अशी व्यवस्था केली. राज्यात हुंडा घेणे आणि देणे बंदी, दारूबंदी यासारखे कायदे केले ते केवळ प्रजेला सुखी करण्यासाठीच.

           प्रजेला नियमित काम मिळावे व कलावंतांच्या वास्तुकला जिवंत राहाव्यात यासाठी सर्वधर्मसमभावाचा आदर्श गिरवीत मंदिरांची निर्मिती व जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. खडेपीर, चांदवड येथील नानावली दर्गा, बुखारी बाबांचा दर्गा, चांदशहा दर्गा व अनेक पीर, मशिदी बांधल्यात.या सर्वांच्या देखरेखीसाठी कायमस्वरूपाच्या नेमणुका करून दिल्यात.रस्ते व महारस्ते बांधून पाणपोया सुरू केल्यात.त्यामुळे प्रजेला कामं मिळालीत आणि पर्यटनाला प्रोत्साहनही मिळाले. अहिल्याईंनी उपेक्षित, दलित, पिडीत,  आदिवासी, भटके - विमुक्त, ओबीसी, गरीब, मजूर, कामगार यांच्या हितासाठी, उपजीविकेसाठी, कलाकौशल्यांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आयुष्य वेचले.

           वैशिष्ट्यपूर्ण होळकरांच्या राज्यात सरकारी कोष आणि खाजगी कोष होते.महसूल व कराद्वारे प्राप्त होणार्‍या उत्पन्नाचा समावेश सरकारी कोषात, तर लढाईतील लूट वा खंडणी यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा २५ टक्के वाटा स्त्रीधन म्हणून खाजगी कोषात जमा व्हायचा. खाजगी कोषातून खर्च व विनियोग करण्याचे स्वातंत्र्य पूर्णत: घरातल्या प्रमुख स्त्रीस होते. गौतमाबाईच्या मृत्यूनंतर हा खाजगी कोष अहिल्याकडे आला. या खाजगीतूनच अहिल्याईने जनकल्याणाची कामे केली.

           प्रजेवर जास्त कराचा बोज  न लादता राज्याचा कोष समृद्ध करून राज्य भरभराटीस आणले. हे सर्व कार्य आपल्या खाजगी संपत्तीवर तुळशीपत्र ठेवून, खाजगी उत्पन्नाचा उपयोगसुद्धा लोककल्याणासाठी केला. ‘‘शासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो, तर तो त्यांचा विश्‍वस्त असतो. त्याची उधळपट्टी करण्याचा त्यास काहीही अधिकार पोहोचत नाही.’’ ‘‘राज्यकर्त्यांनी केवळ राजकारणात गुंतून राहण्याऐवजी समाजाच्या म्हणजेच प्रजेच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे.’’- असे त्यांचे तत्त्व होते. हा अहिल्याईचा गुण आजच्या पुढार्‍यांना निश्‍चित घेण्यासारखा आहे. अशा या लोककल्याणकारी कार्य करणार्‍या राष्ट्रमाता अहिल्याईंच्या ३१ मे रोजी  येऊ घातलेल्या २९१ व्या जयंती दिना निमित्त कोटी कोटी अभिवादन!

 होमेश भुजाडे
नागपूर
 ९४२२८०३२७३

सोमवार, ३० मे, २०१६

तयारी एन.डी.ए ची…!!! (National Defence Academy)


तयारी एन.डी.ए ची…!!!    
(National Defence Academy)

         देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या सौरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे सौरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.

         भारतीय संरक्षणदले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच "National Defence Academy (NDA) / एन.डी.ए" च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पहाणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए, खडकवासला, पूणे  येथे करवून घेतली जाते.

पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
         एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विद्यान किंवा वाणिज्य शाखेचा असावा आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे.

वयोमर्यादा:
         एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय साडेसोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया:
         एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.

प्रवेश परीक्षा:
         एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते.

सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:
         भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.

पहिला टप्पा:
         या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.

दुसरा टप्पा:
         या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group  Tasks) व वयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चार्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test  (PABT) ही आणखी एक चाचणी होते.
         मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो.

एन.डी.ए मधील प्रशिक्षण:
         एन.डी.ए मधील प्रशिक्षण कालावधी हा तीन वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए मधील तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो. येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहोणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकर्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.एचे तीन वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.एच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.एच्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:
         एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. Para Jumping, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायमिंग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, आभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या Management कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील  लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते.

अर्ज कधी करावे:
         जून २०१६ मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.एच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए प्रवेशासाठी परीक्षा दि. १८ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.एच्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा दि. १७ एप्रिल रोजी घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.एच्या तयारीसाठी करावा. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी: 
         सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए मध्ये दाखल होऊ शकतात.

एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती:

१. सैनिक स्कूल, सातारा: ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:
        येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती www.sainiksatara.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२. राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून: ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:
         येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती www.rimc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

३. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिटयूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:
         या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी यंदा १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे २०१६ मध्ये घेण्यात येईल.

         अनेक पालकांची आपल्या पाल्याला एन.डी.ए मध्ये पाठविण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्ग माहीत  नसल्यामुळे त्यांचे पाल्य एन.डी.ए प्रवेशास मुकतात. बर्याच पालकांचा असा गैरसमज असतो की एन.डी.ए ला जाण्यासाठी घोड्सवारी, रायफल शुटींग जमणे किंवा जिमला जाणे आवशक आहे. परंतु वरील माहिती वरून आपल्या लक्षात येईल की एन.डी.एच्या लेखी परीक्षेसाठी ११वी व १२वी च्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच मुलाखत उत्तीर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा सांघिक खेळ खेळून आपले नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज थोडावेळ मैदानात जाऊन व्यायाम केला किंवा नियमितपणे मैदानात एखादा सांघिक खेळ खेळला तरीही असे विद्यार्थी एन.डी.ए निवडी मधील सर्व शारीरिक चाचण्या पूर्ण करू शकतात. एक गेष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की एन.डी.ए ला निवड झालेले बरेचशे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील तसेच कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नसलेली असतात. एन.डी.ए मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचेच मुले सिलेक्ट होतात हा देखील एक गैरसमज अथवा न्यूनगंड आहे. गुगल वर थोडा शोध घेतला की लक्षात येईल की एका सर्वसाधारण रिक्षा चालकाचा मुलगा, शेतकर्याचा मुलगा, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, पोलिस हवालदाराचा मुलगा असे बिगर लष्करी पार्श्वभूमी असलेले असंख्य मुले एन.डी.ए मध्ये दाखल होऊन आज लष्करात अधिकारी पदाच्या मोठ्या हुद्यावर आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्या, एन.डी.एला जाण्याचे आपले ध्येय्य निश्चित करा आणि लागा तयारीला.