लोकप्रिय पोस्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लोकप्रिय पोस्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १७ मे, २०१६

बेटी हिरा आहेस

✍�� जरूर वाचा

☄" एकदा एका मुलीने तक्रार केली बापाकडे, मलाच का बंधने ? जाऊ नको कुणीकडे....."

" बाप बोलला बेटी म्हणणे तुझं पटतयं चल जरा बाहेर, आत खूप उकडंतयं....."

���� पेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं, बाहेरच पडल होत, अवजड सामान लोहाचं, बाप बोलला ,बेटी ! हे, ऊनपावसात इथंच असतं तरी पण याला काही होत नसतं, किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं......,

जरा पुढे जाताच ,ज्वेलरी शाँप दिसलं
आत जाऊन मग ,हिर्यचा मोल पुसलं
तिजोरीतून बंद पेटी ,हळूवार पुढे मांडली त्याच्या झगमगाटात ,नजरच दिपली, सराफ बोलला किमती आहे,फार जपावं लागतं जरा सुद्धा चरा पडता ,मोल याचं घटतं
काळजी घेऊन खूप,जपून ठेवावं लागतं तिजोरीच्या आत , लपवावं लागतं.......,

फिरून घरी येताच, बाप बोलला "बेटी! तूच तर माझी, हिर्याची पेटी
सांग तुला जपण्यात ,काय माझं चुकतं तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"

"तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही तू म्हणजे अनमोल हिरा, सांग चुकतं का काही
तुझ्यामुळेच घर प्रकाशित,आमचा तु अभिमान, तुझ्यासाठी काळीज तुटतं, तु जीव की प्राण"

" बस्स! करा बाबा "ऎकवत आता नाही तुमच्याकडे माझी ,तक्रार मुळीच नाही मीच मला आता ,जीवापाड जपेन हिर्याच्या तेजानं, चौफेर चमकेन."

  पटवून द्या तिला बेटी! तू हिरा आहेस
आमच्या आनंदाचा तू झरा आहे
म्हणुन जपाव लागत.....!

��������������������������������

'वाद'आणि 'चर्चा' यात 'फरक'

'वाद'आणि 'चर्चा' यात 'फरक' काय..?                 
वादातून  'भांडणं'  होतात;
चर्चेतून 'गोष्टी स्पष्ट' होतात. 
वाद "अहंकार आणि  संकुचित  मनातून" होतो;   चर्चा 'मोकळ्या मनातून' होते.

वादात 'अज्ञानाची देवाणघेवाण' होते, 
तर चर्चेत 'ज्ञानाची देवाणघेवाण''होते. 
वाद ही 'रागाची अभिव्यक्ती'आहे; 
तर 'चर्चा'ही'तर्काची अभिव्यक्ती'आहे...

'' वादातून कोण बरोबर हे "सिध्द  करण्याचा प्रयत्न होतो" 
तर 'चर्चेतून' "काय बरोबर हे सिध्द करण्याचा" प्रयत्न होतो

वाद "निरर्थकच" असतो..
"वादा"पेक्षा 'चर्चेने' आणि 'चर्चे' पेक्षा,
"संवादाने" प्रश्न "मार्गी" लागतात.

शुक्रवार, ६ मे, २०१६

सैराट........


नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय.
-सचिन तायडे, पब्लिक स्पिकर
सैराटचं यश कशात.
 सैराटचं यश हे त्या प्रत्येकाचं यश आहे, ज्याला अमानुषतेची चीड आहे , सैराटचं यश हे त्या प्रत्येकाचं यश आहे ज्याला आपलं जगणं कुठल्याशा फुटकळ मध्ययुगीन परंपरांमुळं नाईलाजानं एकतर स्वतःच बरबाद करावं लागतं किंवा कुणाकडून ते केलं तरी जातं... सैराट चं यश हे त्या प्रत्येक ‘पुरूषी’ अहंकाराचं अपयश आहे ज्या पुरूषी अहंकाराला सांभाळणारी स्त्रीच या समाजात खाणदानी ठरवल्या येते.. सैराटचं यश त्या प्रत्येकाचं आहे ज्याने मातीतून उगवून, बंडखोरी करून आभाळाला स्पर्श करण्याचं स्वप्न पाहिलंय.. आणि सैराटचं यश हे त्या प्रत्येक जोडप्याचंही यश आहे ज्यांनी शेवटपर्यंत एकामेकांची साथ कधीच सोडली नव्हती…
सोशल मीडियावर सैराटची बदनामी... 
 मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं सांस्कृतिकच नव्हे तर अख्खं सामाजिक जीवनच सैराटमय झालंय.. जो तो सैराटमय झालाय. मात्र याचवेळी सुरू झालेल्या, बुरसटलेल्या विरोधकांच्या बालीश, परंतु तितक्याच धूर्त नि जातीयवादी युक्तीवादामुळं सैराटच जराही नुकसान झालं नाही हेही विशेष... उलट सोशल मीडियावर जेवढा अपप्रचार करण्याचा फुटकळ प्रयत्न झाला तितके जास्तच हाऊसफूलचे बोर्ड राज्यभरातल्या थिएटरवर धडाधड लागल्या जात आहेत…
 
शेवट हेलावून टाकणारा.... 
 सैराट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता आणि अजूनही आहे…काहींना ‘रिंकू’ जाम आवडली म्हणून असेन वा काहींना ‘आकाश’ जबराट वाटला, म्हणून असेन.. वा काहीजन नागराज मंजुळे यांचे मोठे फॅन असतील म्हणूनही असेल…कारण काहीही असो, सैराट ने एक वादळ उभं केलय ज्याच्या त्याच्या मनात… झिंगाट हे गाणं सुरू झाल्यावर जो तो थेएटरमधे बूंगाट होऊन चिंगाट नाचतोय हे चित्र एकीकडे पहायला मिळत असतांनाच चित्रपट संपतांना मात्र थिएटरमधे भयान सुन्नता पसरून जाते, हातपाय गळून जातात, कित्येकांच्या तर डोळ्याच्या कडा आपोआप ओल्याही होतात आणि कुणीही एकामेकांशी फार काही न बोलता आपआपल्या गाड्यांना पार्कींग एरियातून काढून सुन्न , प्रश्नांकीत चेह-याने घराकडं निघून जातोय…जातीचं अतिशय वास्तव मात्र तितकच क्रूर, कडू सत्य नागराजने सैराटच्या शेवटच्या क्षणांत चितारलय…सिनेमाचा शेवट भयानक आहे… कदाचित तुमच्या कित्येक रात्री खाणारा आहे…तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा आहे…नागराजने फँन्ड्री च्या वेळीही हेच केलं होतं शेवटच्या क्षणी जब्याच्या हातातून त्याने जो दगड भिरकावला होता तो इथल्या जातीय सरंजामदारांना बरोबर जाऊन बसला होता.. यावेळीही सैराटनं तेच केलय मात्र यावेळी चार पाऊलं पुढं गेलय सैराटचं हे कथानक... सौंदर्य, प्रेम आणि क्रौर्य या तीन भूमिकांचा आवाज झालाय हा सिनेमा…
झी स्टुडिओचे आभार...
नागराज मंजुळेच्या पटकथेचं नि एकूणच त्यांचं कौतुक करतांना विशेष आभार त्या प्रोड्यूसरचे मानले पाहिजेत ज्यांनी अशा विषयाला पाठबळ दिलय..विशेष आभार अजय-अतुल या जोडीचेही व्यक्त केले पाहिजेत, ज्यांनी अगदी अमेरिकेत जाऊन तिथल्या कलाकारांच्या सहाय्याने या सिनेमाचं जबरदस्त म्युझिक तयार केलंय…नागराजचं  विशेष अभिनंदन यासाठीही की या माणसाने जे पाहीलं किंवा जे जे तो जगत आलाय तेच तो दाखवण्याचा आग्रह धरतोय.. निव्वळ गोड गोड दिखावा...गुडीगुडी खोटा खोटा रोमँन्टीसिझम या माणसाला कबूल नाही... त्याच्या “उन्हाच्या कटाविरूद्ध” या काव्यसंग्रहाला वाचतांनाही हे सतत जाणवत राहतं की या माणसाची नजर अस्सलतेला प्राधान्य देते...या माणसाची भाषाही पडद्यावर तीच असते जी त्याच्या रोजच्या जगण्यात आहे… शुद्ध शब्दांचा, शुद्ध उच्चारांचा पोक्कळ आवेश नाही वा सो कॉल्ड बॉडीलँग्वेजचा अभिनिवेश दिसत नाही, नागराजच्या जगण्यात ना त्याच्या सिनेमात. आज घडीला राज्याच्या गावागावांमधे करोडो लोक जे खरं जीवन जगतात तेच नागराज त्याच्या पटकथेत मांडतोय… 
नागराजचं कौतुक करावं तेवढे थोडं...
साध्यासुध्या चेह-याची, जाड्याभरड्या काळ्या रंगाची माणसं, उन्हात काम करून करून घामानं चिंबलेले मजूर, संसार जगवण्यासाठी दिनरात राबलेल्या अन् रापलेल्या आज्या त्याला महत्वाचाएत… तर दूसरीकडे स्त्रीच्या सौंदर्याची पिढ्यानपिढ्या ठरलेली टीपीकल व्याख्या तर सैराटच्या रूपानं नागराजने टराटर फाडलीय… मात्र हे सारं काही अनेकांना सहन होणारं नाहीए खरतर अनेकांना झोंबणारच आहे  हे  सारं…जातीचा माज असलेल्यांना तर हा सिनेमा म्हणजे संस्कृती बुडवणारा वाटायला लागलाय…मुळात कोणत्या संस्कार आणि संस्कृतीचं तुणतुणं वाजवत असतो आपण..? या सिनेमात आर्ची च्या बूलेट ला शिवरायांचा झेंडा आहे म्हणून काही पोट्यांचं टोळकं कोर्टात जाण्याच्या बेतात होतं.. अनेकांनी सोशलमिडीयावर तर सैराटविरुद्ध “ धर्म खतरेमें है ”  सारखं वादळ उठवण्याचा वावटळी प्रयत्नही करून पाहिला…मग यावेळी किशोरवयीन मुलांमुली व त्यांच्यावर पडणा-या संस्कारांपर्यंत अनेकांनी आपलं लबाड समाजप्रबोधन सुरू केलं... या आधी असे कित्येक चित्रपट आलेले आहेत.. हिंदी सिनेमाचा सनी लिओनी पर्यंतचा प्रवास तर सांगायलाच नको....अगदी मराठीत सुद्धा बीपी, शाळा ,टाईमपास सारखे चित्रपट डोक्यावर घेण्यात आलेत मात्र त्यावेळी असं रान कुणी उठवलं नाही कदाचित सैराट च्या निमित्तानं झालेली तुफान प्रसिद्धी आणि लोकांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हे सारं काही एक वडार समाजातून आलेल्या एका मंजुळेला मिळतय हे सारं कही अनेकांना पाहावल्या गेलं नसावं… या सा-याच विरोधात जातीचा दूर्गंध अधीक जास्त जानवतोय…आणि नेमकं नागराज ने, जे आजूबाजूला रोज घडतय तेच सैराटमधून दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय …
महाराष्ट्रातील 'सैराट' वास्तव...
काही महीण्यांपूर्वीच कोल्हापूरमधे लग्न करून आपला संसार सुरू केलेल्या एका जोडप्याला मुलीच्या भावांनी रात्रीच्यावेळी घरात घूसून गळे चिरून जिवंत मारलं हे वास्तव नाही का? नगर जिल्ह्यात खर्डा येथे नितीन आगे प्रकरणात सुद्धा त्या अकरावीत शिकणा-या पोराच्या शरीरात मागच्या बाजूने त्याच्या अंगात वीटभट्टीतली तप्त सळई खूपसून हालहाल करून आणि नंतर झाडाला लटकवून ठार मारलं हे वास्तव नाही का? राज्यभरात विविध ठिकाणी कुठे हातपाय तोडण्यात आलेएत.. तर कुठे अख्ख्या गावानेच बहिष्कृत करून नग्न धिंड काढलीय तर कुठे कुणाचे डोळे फोडण्यात आलेय हे वास्तव नाही का ? तर शिर्डीमधे भीमगीताची रिंगीग टोन ठेवल्यामुळं सागर शेजवळच्या तोंडावर,छातीवर बूलेट रगडून रगडून त्याला मारण्यात आलं हेही वास्तव नाही का ? आश्चर्य याचंय की हे सारं एकतर इज्जत वाचवण्यासाठी केलं जातय किंवा जातीची दादागीरी बरकरार ठेवण्यासाठी केलं जातय… 
शिवाजी महाराजांना ओढून आणतायं...
 यात सगळ्यात वाईट काही असेल तर ओढून ताणून या सा-यात शिवरायांना ओढून आणलं जातं…महाराजांचा उदो उदो करतांना काही खूजे लोक महाराजांच्या पायाची धूळ बनण्याची लायकी नसतांनाही स्वतःला छत्रपती म्हणवून घेतात... महाराज, राजमाता जिजाऊसाहेब यांना कळल्या नाहीत आणि कळणारच नाहीत…अशांचं कर्तृत्व काय, तर ते महाराज ज्या जातीचे होते त्याच जातीत हेही जन्माला आलेत एव्हढच… खरतर हे सारच दुर्देवी आहे…तरीही आजघडीला महाराजांच्या ख-या संस्कारांवर चालणारे असंख्य आहेत हेही नाकारून चालणार नाही परंतू ही जमेची बाजू जरी असली तरी अशांची संख्या तुलनेने कमीच आहे.
जातीयवादाची दुर्गंधी
87 व्या अखिल भारतीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी मराठा जातीत जन्मलेले फ.मु.शिंदे यांची निवड झाली होती त्या प्रसंगी माध्यमांसमोर बोलतांना शिंदे आवर्जून म्हणाले होते की, “ पिढ्यापिढ्या जे उन्हातच होते अशांना सावलीत आणणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी मला मिळालेला हा अध्यक्षपदाचा बहुमान अर्पण करतो…” एखाद्या उच्च जातीत जन्माला येउन अशी सहवेदना वाटून घेणारे असे लिखाणाच्या, चिंतनाच्या आणि कलेच्या क्षेत्रात काम करणारे कितीजण आहेत?  हाच खरा सवाल मला वाटतं सैराटच्या निमित्तानं पुन्हा उभा राहिला आहे... निव्वळ राजकीयच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातही ही जातीयवादाची दुर्गंधी पोहचलीय..आधी काही लोकांच्या ओठात जात असायची आता ती पोटातही आहे आणि कृतीतही आहे याचे दुःख अधीक आहे…
ग्रामीण जीवन पडद्यावर...
या सा-यामुळचं नागराज आजूबाजूचं उघडंनागडं सत्य दाखवण्यावर भर देतोय, मुळात तो त्याची ही जबाबदारी मानतोय.  ज्याची पर्वा इथल्या इस्टमनकलरवाल्यांना कधीच नव्हती ना इथल्या कित्येक पटकथाकारांना हे सारं लिहीणं कधी गरजेचं वाटलं ? जे करोडोंचं जगणच नाही तेच पडद्यावर आतापर्यंत दाखवण्यात प्रयत्न होत आलाय. नेमकं याच गोष्टीला नागराजने फाटा दिलाय. खरतर आजूबाजूच्या सामाजिक विस्तवाचं वास्तव लक्षात घ्यावसं वाटत नाही कित्येक पटकथाकारांना . काही विचारवंत - लेखकांना शेजारच्या जिल्ह्यात काय शिजतय आणि याही उपर जाऊन आपल्या बुडाखाली काय जळतय याचं साधं सोयरसूतक नसतंच. मात्र तिकडे आखातातल्या तेलावर किंवा तिथल्या भयंकर अशा रासायनिक अण्वस्त्रांवर किंवा लँटीन अमेरिकेत झालेल्या बदलांवर आपली लेखणी पळवायला यांचा हात अधिकची गती घेतो.  उंटाचा मुका घ्यायच्या स्पर्धेत उतरू पाहणा-या या विचारवंत लेखकांना देशाच्या विकासासाठी वा एकूणच प्रगतीसाठी युरोपीअन देशांची वा अमेरिकेतल्या पाच पन्नास राज्यांची तूलना करणारी लीटमस टेस्ट नेहमीच गरजेची का पडते हेही कळत नाही.
लग्नाचा बाजार... 
सिनेमात लग्नाचं जोडपं हे हमखास गोरंगोमटं दाखवण्यावर भर असायचा मग हेच प्रतिबिंब समाजातही पडायला लागलं..प्रत्येकाला आपली जोडीदारीन ऐश्वर्या राय सारखी हवीय आणि जोडीदार शाहरूख सारखा..बाकीच्यांचं जणू हृदय धडधडतच नाही, त्यांना जणू प्रेमच होत नाही... बाकीच्यांना जशा काही भावनाच नसतात. मुळात याला - त्याला दाखवण्यासाठीच ज्यांचा त्यांचा हा रंगाचा, सौंदर्याचा खटाटोप सुरू असतो…अगदी लग्नाच्यावेळीही केवळ याला त्याला दाखवण्यासाठीच अगदी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करण्यात येतो, हुंडा देतांना घेतांना मुळात ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे मात्र उलट “आमच्यात हुंडा खूप असतो ना” हे असं किळसवाणं वाक्य वापरतांना त्यांचील छाती अभिमानाने फूलून येते. कित्येक घरांमधे मुलीला पाहण्यासाठी एक नाही दोन नाही पन्नास पन्नास मुलं  येऊन जातात, मग पन्नास वेळेला चहा बनतो, पन्नास वेळेला पोहे तयार होतात, पन्नास वेळेला तीला साडी नेसावी लागते..पन्नास वेळेला तीला चेह-यावर हसू ठेवावं लागतं या सगळ्यातून बिचारी तरली की मग एकतर देण्याघेण्यावरून मुद्दा फिस्कटतो किंवा कुठले तरी गुणच जूळून येत नाहीत..जर वागणुकीच्या बाबतीत काही चूकीचं जाणवलं असेल तर लक्षात येऊ शकतं मात्र दिसण्याहून किंवा रंगावरून जेव्हा नाकारण्यात येतं अशावेळी कुण्या परक्यानं आपल्याला नाकारल्याचं दुख एकीकडे नक्कीच होत असतं मात्र त्याहीपेक्षा अधिक वेदना त्यावेळी होतात ज्यावेळेला आपल्या घरातलेच आपल्याच पोटच्या पोरीला तू बूटकी आहेस काळी आहेस म्हणून तुझं लग्न होत नाहीए असं म्हणतांना दिसून येतात.. मुळात आपल्याला मिळेलेल्या शरिरापासून संस्कारापर्य़तची सारी देण मायबापाचीच तर असते.
आधुनिकता म्हणजे काय....
 प्रतिभावान नाटककार शेक्सपिअर नेहमी म्हणायचा निग्रो स्त्री ही मला जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटते..ते तीच्या गडद काळ्या रंगामुळेच. तिच्या रंगात इतर कुठलीही मिलावट होऊ शकत नाही.. कुठलाही मेकअप तिला, तिच्या अस्सलतेला बदलवू शकत नाही. जगण्यातली आणि दिसण्यातली अस्सलताच तर अधिक महत्वाची असते. चेहरा गोरा आहे या पेक्षा मन स्वच्छ असणं हे अधिक श्रेयस्कर नाहीए का..? मातीत राबणारे काळेकुळकुळीत झालेले शेतमजूर प्रेमळ, मायाळू नसतात का..? विकलांगता शरिराला असेल तर हरकत नाही मात्र वृत्तीनं विकलांग असणं हे कितीतरी घातक असतं.. मॉलमधे इस्केलेटरवर उभं राहता येणं किंवा चार इंग्रजीचे शब्द बोलता येण्यानं कुणी आधुनिक होत नसतं..आधुनिकतेचा संबंध योग्यतेशी असतो.. नसता , स्पर्धा परीक्षेसाठी समाजसुधारक पाठ करायचे आणि पोस्ट हातात पडताच हुंडा मागून लग्नाच्या बाजारात स्वतःचा भाव ठरवायचा हा असा करंटेपणा करणा-यांना  बहिष्कृत करण्याची एक मोहिमच आता हातात घेतली पाहीजे..
भयानक सत्य...
 जातीसाठी माती खाऊन पोटच्या पोरीला जिवंत मारणा-यांना चौकात नेऊन बदडलं पाहीजे... कुठे बलात्कार झाला असेल तर अशी छापून आलेली बलात्काराची बातमी चवीनं नाही तर रागानं वाचली पाहीजे…नागराज त्याचा हा असा साराच राग सैराट सारख्या चित्रपटांतून व्यक्त करत चाललाय…जातीसाठी दिवसरात्र जगणारे कित्येक वंशाचे दिवे ‘प्रिंस’ च्या माध्यमातून नागराजने जगाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांना आपल्या बहिणीपेक्षा आपली जात मोठी असते…मुळात अशा कित्येक ‘प्रिंस’ला भैय्या भैय्या म्हणून एक माजलेला पुरूष बनवण्यासाठी त्या त्या घरातले कित्येक आजी आजोबा आणि कित्येक मायबाप कारणीभूत असतात, लहानपणापासूनच मोठ्याप्रमाणावर त्यांचे सारेच लाड पुरवण्यावर इतका भर असतो की पुढे ते स्वतःच्या आईला ‘घरात नीट रहायचं नाहीतर तुला मामाच्या घरी नेऊन सोडेन’ इथपर्यंत बोलायची हिम्मत ठेवतात…हे सारं खूप भयानक आहे परंतु सत्य आहे…नागराज या अशाच कित्येक जळजळीत सवालांच्या विरोधात उभा राहीलाय अगदी सैराट बनून…
 
नागराजचं सैराटपण कायम राहो....
 नागराजमधे पराकोटीचा आत्मविश्वास आहे, मुळात हा आत्मविश्वास त्याला त्याच्या अनुभवांनी, निरिक्षणांनी आणि संवेदनशीलतेनच बहाल केलाय. म्हणूनच की काय आमचंही संपूर्ण नाव आम्हीही अभिमानाने मिरवून दाखवू शकतो ही त्याची कृतीशील धारणा आहे…त्याने स्वतःला सिद्ध केलय..जर्मनीमधे तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लोकांनी त्याला डोक्यावर घेतलय नि रिंकू राजगुरू या देखण्या मुलीला पदार्पणातच मिळालेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारानं ते अधिक स्पष्टही झालय की सैराट एक लाजवाब चित्रपट आहे , नागराजचं हे सामाजिक जाणीवांचं सैराटपण अजून काही अशाच चित्रपटांच्या निर्मितीचं कारण बनत राहो याच सदिच्छांसह तूर्तास थांबतो. 
सचिन तायडे, पब्लिक स्पिकर : 

शुक्रवार, १ एप्रिल, २०१६

बेटी

विधाता  ने जब किसी
बेटी  को बनाया होगा,
मानव  निर्माण  के लिए  इस धरती  पर छोडने  आया  होगा......
उस दिन विधाता  भी सारी  रात  नहीं  सोया  होगा......
और  बेटी  की जुदाई  मे फुट  फुट  कर रोया  होगा......

कइ जन्मो की  जुदाई  के  बाद  बेटी  का जन्म होता है ......
इसलिए  तो कन्यादान  करना  सबसे  बड़ा  पुण्य  होता है.......

बेटी  पिता व पति दोनों  के घर  का सम्मान  रखती है,
चाहे  पत्थर  पडे हो,  चेहरे  पे मुस्कान  रखती  है.........

बेटी  की आत्मा  से उस दिन  भी  दुआओं  के फुल  बरसते है........
जिस  दिन राखी के कच्चे धागे भाई  की कलाई  को तरसते है.......

माँ  बाप के दखल  से बेटी  के कई ख्वाब  पुरे नहीं  होते.......
फिर  भी  बेटी  की नजर  मे  माँ  बाप  कभी  बुरे  नहीं  होते......

दिल  मे खुशी,  मगर  चेहरे  पर  गम की परछाई  होती है......
कठोर  दिल  बाप  भी  रो देता है,  जब  बेटी  की विदाई  होती  है.....

बेटी  माँ  बाप  की खुशी  की हमेशा  दुआ माँगती है......
वह सुख मे हो या दुख  मै चौखट  पर उनका  रास्ता  निहारती है........

है ईश्वर......
मैरा आपसे  बस इतना  ही है कहना.......
आप कुछ  दो या ना दो, 
हर घर  मै एक  प्यारी  सी बेटी  जरुर  देना.........

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

दडलय गुपीत पानापानात

" दडलय गुपीत पानापानात"

तुळशीचे पान - विष्णूपदी स्थान ।
बेलाचे पान - शंकरचा मान ॥
केवड्याचे पान - नागाचे स्थान ।
रुईचे पान - मारुतीला छान ॥
केळीचे पान - भोजनाशी छान ।
नागिणीचे पान - गोविंदविड्याला छान॥
मेंदीचे पान - शकुनाचा मान ।
पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान ॥ पिंपळाचे पान - मुंजाचे स्थान ।
गुलाबाचे पान - काटेरी छान ॥
कढीपत्त्याचे पान - फोडणीत स्थान ।
आळूचे पान - अळूवडीला छान ॥ तमालपत्राचे पान - मसाल्याची शान ।
वहीचे पान - लिहायला छान ॥
पुस्तकाचे पान - माहितीची खाण ।
गवताचे पान - दवबिंदू शोभायमान ॥ ओव्याचे पान - सुवासिक छान । 
त्याला भजीत - मान ॥
तुळशीचे पान - स्मरणिशक्तीला महान । आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान॥
आंब्याचे पान - तोरणाची शान|
त्याला शुभ कार्यांत - मान
--------- ---------

सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

बेटी से माँ का सफ़र

बेटी से माँ का सफ़र  (बहुत खूबसूरत पंक्तिया , सभी महिलाओ को समर्पित)

बेटी से माँ का सफ़र
बेफिक्री से फिकर का सफ़र
रोने से चुप कराने का सफ़र
उत्सुकत्ता से संयम का सफ़र

पहले जो आँचल में छुप जाया करती थी  ।
आज किसी को आँचल में छुपा लेती हैं ।

पहले जो ऊँगली पे गरम लगने से घर को उठाया करती थी ।
आज हाथ जल जाने पर भी खाना बनाया करती हैं ।

छोटी छोटी बातों पे रो जाया करती थी
बड़ी बड़ी बातों को मन में  रखा करती हैं ।

पहले दोस्तों से लड़ लिया करती थी ।
आज उनसे बात करने को तरस जाती हैं ।

माँ कह कर पूरे घर में उछला करती थी ।
माँ सुन के धीरे से मुस्कुराया करती हैं ।

10 बजे उठने पर भी जल्दी उठ जाना होता था ।
आज 7 बजे उठने पर भी
लेट हो जाता हैं ।

खुद के शौक पूरे करते करते ही साल गुजर जाता था ।
आज खुद के लिए एक कपडा लेने में आलस आ जाता हैं ।

पूरे दिन फ्री होके भी बिजी बताया करते थे ।
अब पूरे दिन काम करके भी फ्री
कहलाया करते हैं ।

साल की एक एग्जाम के लिए पूरे साल पढ़ा करते थे।
अब हर दिन बिना तैयारी के एग्जाम दिया करते हैं ।

ना जाने कब किसी की बेटी
किसी की माँ बन गई ।
कब बेटी से माँ के सफ़र में तब्दील हो गई .....
������

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

शराब पर महत्त्वपूर्ण लेख

:

शराब का हमारी अर्थव्यवस्था में बडा महत्व है, क्योंकि शराबी एक मॉडल टैक्सपेयर होता है। किसी भी आइटम पर टैक्स लगाया जाये, उसे देने वाला बवाल मचा देता है। पैट्रोल पर एक डेढ़ रुपया बढ़ जाऐ, मार ड्रामा शुरु हो जाता है। बीएमडब्ल्यु वाला भी हुड़की लगाकर चैनलों को बयान देने लगता है कि हम मर गये, लुट गये, तबाह हो गये।

पर शराब का खरीददार अत्यँत शालीन होता है। औसतन हर साल शराब के भाव 15-20 परसेंट तो बढ़ते ही है, दिखा दे मुझे कोई कि कभी किसी शराबी ने चिक-चिक मचायी हो। इतिहास में एक भी जुलूस ऐसा नहीं दर्ज है, जिसमें शराब के खरीदारों ने डीएम को जुलूस निकालकर ज्ञापन दिया हो कि प्लीज दारु सस्ती कर दो। ऐसे उद्विग्न समय में शराबी का सा संयम सराहनीय है, ये इतनी दुर्लभ क्वालिटी है कि सिर्फ शराबियों में ही पायी जाती है।

उत्तर प्रदेश में शराब का कारोबार करीब 14,000 करोड़ रुपये का टर्नओवर दिखा रहा है, करीब 17,000 दुकानें हैं, सभी पर अनवरत लाईन लगी हुई है, कई की जालीदार खिडकियाँ तो सुबह ब्रह्मकाल मे ही खडका दी जाती है।

इसलिऐ लोगो को अनुशासन, शालीनता और संयम का पाठ अगर लेना हो तो किसी शराबी से ले
����
: ��शराब के 5 फायदे

�� शराब व्यक्ति की नैसर्गिक प्रतिभा को बाहर निकालती है - जैसे कोई अच्छा डांसर है, लेकिन अपनी शर्म की वजह से लोगो के सामने नहीं नांच पाता है ..। दो घूंट अन्दर जाते ही अपना ऐसा नृत्य पेश करता है की उसके सामने माइकल जैक्सन भी पानी न मांगे..

ऐसे कई उदाहरण है
आपने शादी ब्याह के अवसर पर शराबियों को नृत्य करते हुए देखा होगा कोई नागिन बनकर जमीन में लोटता है तो कोई घूँघट डाल कर महिला नृत्य प्रस्तुत करता है !

�� शराब व्यक्ति के आत्मविश्वास को कई गुना बढ़ा देती है दो घूंट अन्दर जाते ही चूहे की तरह डरने वाला डरपोक से डरपोक व्यक्ति भी शेर की तरह गुर्राने लगता है । शराब पीने के बाद कई पतियों को अपनी पत्नी के आगे गुर्राते हुए देखा गया है !

��शराब व्यक्ति को प्रकृति के करीब लाती है । दो घूंट अन्दर जाते ही शराबियो का प्रकृति प्रेम उभर कर सामने आ जाता है कई शराबी शराब का आनंद लेने के बाद ज़मीन, कीचड़, नाली आदि प्राकृतिक जगहों पर विश्राम करते पाए जाते है !

�� शराब व्यक्ति की भाषाई भिन्नता को कम कर देता जो लोग अंग्रेजी बोलना तो चाहते है लेकिन नहीं बोल पाते है अंग्रेजी बोलने में हिचकिचाहट महसूस करते है दो घूंट अन्दर जाते ही ऐसी धारा प्रवाह अंग्रेजी बोलने लगता है की बड़े से बड़ा अंग्रेज़ भी शर्मा जाये । ऐसे कई लोगो से आपका पाला पड़ा होगा !

�� शराब व्यक्ति को दिलदार बनाती है। कंजूस से कंजूस व्यक्ति भी दो घूंट अन्दर जाते ही किसी सल्तनत के बादशाह की तरह व्यवहार करने लगता है, ऐसे लोगो के जेब में भले फूटी कौड़ी न हो लेकिन ये लोग ज़माने को खरीदने में पीछे नहीं हटते है!
������������������
इस महत्वपूर्ण जानकारी को हर शराबी तक पहुंचाइये ताकि वह भी गर्व महसूस करे ।
��
ABBA (अखिल भारतीय बेवड़ा एसोसिएशन) द्वारा जनहित मे जारी

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

आत्मबल - भामरे आण्णा


जीव सृष्टी जशी निर्माण झाली तशी प्राणी मात्रा स्वताःहाचे बल आजमावू लागले.
बल म्हणजे शक्ती ;ताकद .
मात्र माणसाचा जस जसा विकास झाला तस तसा त्याच्या बलाचे प्रकार वाढत गेले
शारिरीक बल; बौद्धिक बल; मौखिक बल.वगैरे
पण त्याने खय्रा अर्थाने या बलांच्या जोरावरच अध्यात्माचा शोध लावला.
त़्या द्वारे संपुर्ण शरिरावर अधिराज्य मिळवले ते आत्मबलाने.
त्याद्वारेच त्याने काम ;क्रोध; मद: मत्सर; लोभ या शरिरावर ताबा  बळकावणाय्रा शत्रूंवर विजय मिळवला.
आत्मबल वाढवा ;जेपासा!
व ध्येय प्राप्त करा!
शुभ प्रभात!!!
जय शंभो!!!!

देवाला पण मानलं पाहिजे

देवाला पण मानलं पाहिजे.
तो माणसांच्या जोड्या पण विलक्षण बनवतो.

एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाण होईल हे त्याला माहित असतं म्हणून तो
मित्रांच्या , प्रेमाच्या
अगदी
नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना
दोन अशा व्यक्तीमत्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील.

अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो ,
गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो ,
भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो
आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते,
ज्या योगे त्यांचही कुठे अडणार नाही...

खर तर
दोन व्यक्तीमध्ये फरक हा असणारच.

परंतु हा जो फरक आहे तो ओळखून तुम्ही कसे निभावता हे जास्त महत्वाचं असतं.

कधी कधी आपण हतबल होतो...

कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही..

पण कोण चुकतं त्यापेक्षा काय चुकतं
हे एकदा कळलं की उत्तरं सोपी होतात.

अनेकदा आपला दुषित दृष्टीकोन हाच एक मोठा अडथळा असतो.

आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल ,

तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो.

पण आपणही समोरच्या अपेक्षांमध्ये उतरतो का हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.

वेगळेपण आहे म्हणून नात्यांमध्ये सौंदर्य आहे...

सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे ,
नीरस होईल ?

उदास व्यक्तीच्या
सोबत उदास माणूस
कस वाटत ?

प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा ,
एकट राहू नये
ह्यासाठी
मैत्री , जोडीदार , सहचर अशा गोष्टी उदयास आल्या
पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगुल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही.

आपलं माणूस थोडसं वेडगळ आहे ,वेगळं आहे
पण
गोड आणि प्रिय आहे असा विचार करायला सुरवात केली
की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जात.

अनुरूप शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही न ?

एकमेकांना अनुरूप म्हणजेच
जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढतो
कधी
गुणांनी, कधी स्वभावाने, कधी विचारांनी....

म्हणूनच विविधतेत एकता असते.

ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर , संवेदेनशील आणि मोहक नातं निर्माण होतं जे आपल्याला जपते
आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो ......

आनंदाचं देणं-घेणं

 

��'गुडमॉर्निंग', 'सुप्रभात' अशा सुंदर शब्दां च्या देवाणघेवाणीतून आपल्या दिवसाची सुरुवात होत असेल, तर ती किती आनंददायी ठरू शकते ? कारण हाच 'सुप्रभात' शब्द एक चांगला मूड बनवतो.
��मूड चांगला असला, की आपल्या हातून कार्य चांगले घडते. चांगल्या कामाने दिवस चांगला जातो. आणि दिवस चांगला जात असला, की आपण आनंदी होतो आणि आपण आनंदी असलो,की आपल्या सहवासा तला प्रत्येक जीवही आनंदी होऊ लागतो.
��आनंदाची ही अनमोल ठेव आपल्याला कुठल्याही बँकेत डिपॉझिट वा विड्रॉ करता येत नाही. फक्त पुन्हा पुन्हा मिळवता तेवढी येते. कारण या व्यवहाराला स्वार्थस्पर्श नसतो. केवळ 'देणं' तेही आनंदाचं, एवढंच त्या जिवा ला ठाऊक असते. म्हणून आनंद हा मिळत नसतो, तो मिळवावाच लागतो. तो देता येतो, घेता येतो, फक्त छोट्याछोट्या गोष्टींत तो शोधावा लागतो..!!

    

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

एक पत्र - सौ. निर्मला श्रीपाद गुरव, बड़ोदा

कर्नल महाडिक,

माझ हे पत्र आपल्यापर्यन्त पोहोचणार नाही, तरी पण लिहितोय. आपले आभार मानायचे होते. धन्यवाद ! आपण आमच्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल शतशः धन्यवाद...

आमच्या सारखी छोटी माणसं एवढंच करु शकतात. तुम्ही तिकडे आमच्यासाठी प्राणार्पण केले, आम्ही मात्र मोदी कसे आहेत, तुरडाळ कशी महागली, लव जिहाद, घर वापसी, मंदीर-मस्जिद, स्मारक कुठे असावे, या वर वाद घालत बसतो. कदाचित आमची वैचारिक ऊँची कधी वाढणारच नाही, असं वाटतंय. तुम्ही गेल्याने काहींना काहीच फरक पड़त नाही. आमचं कार्यालय, आमचा व्यवसाय, आमच्या राजकीय कुरघोड्या आणि चिखलफेक. आमची जातीय समीकरणं... आमचे हॉटेलिंग... आमच्या ओल्या-सुक्या पार्ट्या... काही काही थांबणार नाही. एवढंच काय, आमच्या अतिव्यस्त दिवसात दोन मिनिटं थांबून तुमच्यासाठी दोन अश्रुंची श्रद्धांजली देण्याइतका पण आमच्याकडे वेळ नसतो. आम्हाला काहीच, कशाचाच फरक पड़त नाही. पण फरक पडेल तुमच्या घरच्यांना. ज्यांनी काळजावार दगड ठेऊन तुम्हाला देशासाठी... आमच्यासाठी... सरहद्दीवर जाऊ दिलं. फरक पडेल तुमच्या अर्धांगिनीला. तुम्ही सगळ्यात जास्त अाठवाल, तुमच्या 11 आणी 5 वर्षाच्या पिल्लांना. बाकी सर्व आपल्या आपल्या खुज्या दुनियेत मशगूल राहणार. हे सर्व सत्य आपल्याला माहीत असताना देखील आपण आमच्यासाठी प्राणाहुती दिलीत...

सलाम तुमच्या त्यागाला... सलाम तुमच्या राष्ट्रभक्तिला... सलाम तुमच्या माता-पित्यांना... सलाम तुमच्या सारख्या तमाम जवानांना...
जय हिंद!

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

सुन - श्री कल्पेश शिरसाठ

एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत
असताना
आईच लक्ष जातं,
मुलगा - "आपल्या job मुळे
आईकडे लक्ष देता नाही येणार गं,
तिचं आजारपण आणि देखभाल
कोण करेल......?"
त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे
लक्ष
सुद्धा देतील ते "
त्या वर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून आईच्या
डोळ्यात पाणी आले.
.
.
.
.
.
.
..
सून - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे
ऒ ,
पण
आईंची माया किती कमवली तरी कमी आहे,
त्यांना पैश्यापेक्षा आपल्या सहवासाची गरज
आहे
,
मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान
होणार
नाही.
मी आईंजवळ थांबेन.
घरी tution घेईन ,
त्यामुळे आईं जवळही राहता येईल.
विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम
करून
तुम्हाला आईने वाढवलंय.
त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे
सुद्धा तुम्हाला ठेवल नाही,
कारण तुमच्या कडे व्यवस्थित लक्ष देणार
नाहीत
म्हणून,
आणि तूम्ही आज हे असं
बोलताय...?
तूम्ही कितीही म्हणा पण आई
आपल्या जवळच राहतील.
अगदी शेवटपर्यंत "
सुनेने दिलेल्या उत्तरामुळे आई खूप रडते आणि
बाहेरच्या खोलीत
येउन देवा जवळ
उभी राहते . . .
आई देवाऱ्यापुढे
उभी राहून त्याचे आभार
मानते ,
आणि म्हणते
" देवा मला मुलगी नव्हती म्हणून
खूप भांडली रे मी तुझ्याशी,
पण
हि भाग्यलक्ष्मि दिल्याबद्दल
तुझे आभार कसे मानू मी.....?"
खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सुन
देऊन .��������

मनुष्य कितना मूर्ख है - सौ कविता गणेश गुरव


��प्रार्थना करते समय समझता है कि भगवान सब सुन रहा है,
��पर निंदा करते हुए ये भूल जाता है।
��पुण्य करते समय यह समझता है कि भगवान देख रहा है,
��पर पाप करते समय ये भूल जाता है।
��दान करते हुए यह समझता है कि भगवान सब में बसता है,
��पर चोरी करते हुए ये भूल जाता है।
��प्रेम करते हुए यह समझता है कि पूरी दुनिया भगवान ने बनाई है,
��पर नफरत करते हुए ये भूल जाता है।
��..और हम कहते हैं कि मनुष्य सबसे बुद्धिमान प्राणी है।
��क़दर किरदार की होती है,
वरना...
��कद में तो साया भी
इंसान से बड़ा होता है......
��������
��मंदिर भी क्या गज़ब की जगह है...
��गरीब बाहर भीख मांगते हैं और अमीर अन्दर....
��������

अंतर्मुख करणारा मेसेज - सौ कविता गणेश गुरव

✋������

����
एका देवळात असलेली प्रचंड गर्दी एक मुलगा
कुतूहलाने पाहत होता;

तेवढ्यात एक पंडित त्याच्याजवळ येऊन त्याला
म्हणाला,
"आज देवळात खूप गर्दी आहे, असे उभे राहून दर्शन
होणे कठीण, इथे विशिष्ट व्यक्तींसाठी विशेष
व्यवस्था आहे, मला ५०१/-  रुपये दे, मी तुला थेट दर्शन
करवून देतो!

मुलगा म्हणाला,
"५००१/- रुपये देतो, देवाला सांग, बाहेर ये, मी
आलोय!"

पंडितजी,
"मस्करी करतोस, देव कधी देवळाबाहेर आलाय का?
आणि तू कोण आहेस?"

मुलगा पुन्हा म्हणाला,
"मी ५१०००/- रुपये देतो, देवाला सांग, माझ्या
घराजवळ येऊन भेट!"

पंडितजी,
"तू देवाला समजतोस तरी काय?"

मुलगा,
"तेच तर मी म्हणतोय...
"तुम्ही सर्व जण देवाला
समजता तरी काय..?
पैसे कमावण्याचे साधन?"

विनवणी गुरुजींची

मी एक शिक्षक आहे.
मला माझ्या विद्यार्थयांना शिकवायचे आहे.मराठी शाळा वाचवायची आहे.म्हणून मी सरकारला विनंती करतो!
ही कविता आवडली तर नावासह शेअर करा!

विनवणी गुरुजींची

मास्तर, गुरुजी संपवून,
शब्द-अक्षरांनाही यांनी डांबलं,
उंदीर-मांजरे मोजायला लावून
बालकांचं शिक्षण थांबलं!

कुटूंब नियोजनाचे धडे
गुरुजींनी घरोघरी पेरले
जनगणनेसाठी गुरुजींना
शासनाने वरले!

हागणदारी मुक्तीसाठीही
गुरुजीच त्यांना दिसला
हे काय काम गुरूजींना?
अडाणी बाप हसला!

लबाडांच्या लोकशाहीत
निवडणुक कामाचा भार
शाळा राह्यल्या मोकळ्या
मुलं झाली निराधार!

पुढे स्वयंपाक घरही
आमच्या शाळेला जोडले
पोषण आहार हिशेबासाठी
गुरुजींनी
फळ्यावरचे गणित खोडले!

बांधकामाचा हिशेबही
पुढे गुरूजींकडे आला
उरला-सुरला गुरूजी
असा 'बिल्डर ' झाला!

कधी प्रगणक झाला
तर कधी झाला BLO
गुरुजींच्या विविध भूमिकेत
मुलं झाली LOW!

अशा या online च्या गर्तेत
बुद्धीवान गुरूजी फसला
सोडून मुले वा-यावर
कॉम्प्युटरमध्ये बसला!

आज नवं आलंय फर्मान.......
म्हणे,
शाळा भरणार आठ तास!
कसलं बालमानसशास्ञ ?
अन कशास हा नवा जाच?

उंदरा-मांजरावरचे प्रयोग
नेहमीच आमच्या मुलांवर झाले
ज्यांचा क्षेञाशी संबंध नाही
ते नवं तत्त्वज्ञान सांगून गेले!

बस करा,.......थांबवा आता
मला मुलांनाच शिकवू द्या
शहरासारखं इथंही होईल
मला माझी मराठी शाळा वाचवू द्या! संग्रहित

सूंदर विचार - श्री गिरीश निकम

पायल हज़ारो रूपये में आती है पर पैरो में पहनी जाती है
और.....
बिंदी 1 रूपये में आती है मगर माथे पर सजाई जाती है
इसलिए कीमत मायने नहीं रखती उसका कृत्य मायने रखता हैं
एक किताबघर में पड़ी गीता और कुरान आपस में कभी नहीं लड़ते,
और जो उनके लिए लड़ते हैं वो कभी उन दोनों को नहीं पढ़ते....
नमक की तरह कड़वा ज्ञान देने वाला ही सच्चा मित्र होता है,
मिठी बात करने वाले तो चापुलुस भी होते है।
इतिहास गवाह है की आज तक कभी नमक में कीड़े नहीं पड़े।
और मिठाई में तो अक़्सर कीड़े पड़ जाया करते है