उपासना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपासना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ मे, २०१६

नौ (९) आदतों से नवग्रहो का सम्मान कर सुधारें अपना घर - जीवन

ज्योतिष के अनुसार नौ (९) आदतों से नवग्रहो का सम्मान कर सुधारें अपना घर  - जीवन :��
१)��::
अगर आपको कहीं पर भी थूकने की आदत है तो यह निश्चित है
कि आपको यश, सम्मान अगर मुश्किल से मिल भी जाता है तो कभी टिकेगा ही नहीं . wash basin में ही यह काम कर आया करें ! यश,मान-सम्मान में अभिवृध्दि होगी।

२)��::
जिन लोगों को अपनी जूठी थाली या बर्तन वहीं उसी जगह पर छोड़ने की आदत होती है उनको सफलता कभी भी स्थायी रूप से नहीं मिलती.!
बहुत मेहनत करनी पड़ती है और ऐसे लोग अच्छा नाम नहीं कमा पाते.! अगर आप अपने जूठे बर्तनों को उठाकर उनकी सही जगह पर रख आते हैं तो चन्द्रमा और शनि का आप सम्मान करते हैं ! इससे मानसिक शांति बढ़ कर अड़चनें दूर होती हैं।

३)��::
जब भी हमारे घर पर कोई भी बाहर से आये, चाहे मेहमान हो या कोई काम करने वाला, उसे स्वच्छ पानी ज़रुर पिलाएं !
ऐसा करने से हम राहु का सम्मान करते हैं.!
जो लोग बाहर से आने वाले लोगों को हमेशा स्वच्छ पानी  पिलाते हैं उनके घर में कभी भी राहु का दुष्प्रभाव नहीं पड़ता.! अचानक आ पड़ने वाले कष्ट-संकट नहीं आते।

४)��::
घर के पौधे आपके अपने परिवार के सदस्यों जैसे ही होते हैं, उन्हें भी प्यार और थोड़ी देखभाल की जरुरत होती है.!
जिस घर में सुबह-शाम पौधों को पानी दिया जाता है तो हम बुध, सूर्य और चन्द्रमा का सम्मान करते हुए परेशानियों का डटकर सामना कर पाने का सामर्थ्य आ पाता है ! परेशानियां दूर होकर सुकून आता है।
जो लोग नियमित रूप से पौधों को पानी देते हैं, उन लोगों को depression, anxiety जैसी परेशानियाँ नहीं पकड़ पातीं.!

५)��::
जो लोग बाहर से आकर अपने चप्पल, जूते, मोज़े इधर-उधर फैंक देते हैं, उन्हें उनके शत्रु बड़ा परेशान करते हैं.!
इससे बचने के लिए अपने चप्पल-जूते करीने से लगाकर रखें, आपकी प्रतिष्ठा बनी रहेगी।

६)��::
उन लोगों का राहु और शनि खराब होगा, जो लोग जब भी अपना बिस्तर छोड़ेंगे तो उनका बिस्तर हमेशा फैला हुआ होगा, सिलवटें ज्यादा होंगी, चादर कहीं, तकिया कहीं, कम्बल कहीं ?
उसपर ऐसे लोग अपने पुराने पहने हुए कपडे़ तक फैला कर रखते हैं ! ऐसे लोगों की पूरी दिनचर्या कभी भी व्यवस्थित नहीं रहती, जिसकी वजह से वे खुद भी परेशान रहते हैं और दूसरों को भी परेशान करते हैं.!
इससे बचने के लिए उठते ही स्वयं अपना बिस्तर समेट दें.! जीवन आश्चर्यजनक रूप से सुंदर होता चला जायेगा।

७)��::
पैरों की सफाई पर हम लोगों को हर वक्त ख़ास ध्यान देना चाहिए, जो कि हम में से बहुत सारे लोग भूल जाते हैं ! नहाते समय अपने पैरों को अच्छी तरह से धोयें, कभी भी बाहर से आयें तो पांच मिनट रुक कर मुँह और पैर धोयें.!
आप खुद यह पाएंगे कि आपका चिड़चिड़ापन कम होगा, दिमाग की शक्ति बढे़गी और क्रोध
धीरे-धीरे कम होने लगेगा.! आनंद बढ़ेगा।

८)��::
रोज़ खाली हाथ घर लौटने पर धीरे-धीरे उस घर से लक्ष्मी चली जाती है और उस घर के सदस्यों में नकारात्मक या निराशा के भाव आने लगते हैं.!
इसके विपरीत घर लौटते समय कुछ न कुछ वस्तु लेकर आएं तो उससे घर में बरकत बनी रहती है.!
उस घर में लक्ष्मी का वास होता जाता है.! हर रोज घर में कुछ न कुछ लेकर आना वृद्धि का सूचक माना गया है.!
ऐसे घर में सुख, समृद्धि और धन हमेशा बढ़ता जाता है और घर में रहने वाले सदस्यों की भी तरक्की होती है.!

९)��..
जूठन बिल्कुल न छोड़ें । ठान लें । एकदम तय कर लें। पैसों की कभी कमी नहीं होगी।
अन्यथा नौ के नौ गृहों के खराब होने का खतरा सदैव मंडराता रहेगा। कभी कुछ कभी कुछ । करने के काम पड़े रह जायेंगे और समय व पैसा कहां जायेगा पता ही नहीं चलेगा।
��
अच्छी बातें बाँटने से दोगुनी तो होती ही हैं
- अच्छी बातों का महत्त्व समझने वालों में आपकी इज़्जत भी बढ़ती है।

सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

संकष्टी चतुर्थी महात्म्य

जय गणेश
संकष्टी चतुर्थी महात्म्य
फार पूर्वी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा.
सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला.
पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला.
इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला.
प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेन मरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली.
गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.
श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला.
श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.
श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली.
दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात.

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

श्री सत्यनारायण पूजा

श्री सत्यनारायण पूजा - कोणी, कुठे व कधी करावी ?
.
सत्यनारायण ही पूजा पती-पत्‍नी यांनी जोडीने करावी.
पुरुषांनी अगर मुलांनी केली तरी चालते . सत्यनारायण ही पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी , कोणत्याही वेळेला केली तरी चालते यास मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही तरी पण पौर्णिमा , संक्रांत , श्रावण आणि अधिक ( पुरुषोत्तम ) मासातील पूजा विशेष समजली जाते.
कोणतेही नवीन कार्य सुरू करताना पूजा करतात. संकल्प करताना पूजा करतात . पूजा शक्यतो गोरज मुहूर्तावर करावी .
पूजा होईपर्यंत उपवास करावा. प्रात : काळी पूजा केल्यास उत्तम .
पुजेला बसताना आपले मुख पुर्वेकडे करून पुजेला बसावे . दक्षिणेकडे मुख करुन बसू नये .
पुजा चालू असताना घरातील सर्व मंडळी , आप्तस्वकीय , मित्रमंडळी जर जिथे पूजा चालू आहे , तेथे थांबून मंत्र किंवा कथा ऎकतील तर यातून निर्माण होणार् ‍ या सात्विक लहरींचा त्यांना लाभ होऊन , सत्यनारायणाचे पुण्य मिळेल . या पुजेची कलियुगात नितांत गरज आहे .
.
पुजेला लागणारे साहित्य :
सत्यनारायणाचा फोटो, हळद, कुंकु, गुलाल, बुक्का प्रत्येकी ५० ग्रॅम. फूले, तुळशी (१०८ पाने) हार २, विड्याची पाने ५०, सुपार्‍या २७, नारळ २, खारीक ५, बदाम ५ हळकुंड ५, खोबर्‍याचा तुकडा, गुळाचा खडा, खोबरे वाटी १, खडीसाखर (१०० ग्रॅम), जानवी जोड, १ मीटर कापडाचे दोन पीस, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) सुवासिक उदबत्ती, कापूर, सुट्टी रुपयांची नाणी ७, समया २, निरांजन १, तांदूळ १ किलो, गहू २५० ग्रॅम, केळीचे किंवा कर्दळीचे खूंट ४, शंख, घंटा, बाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम, अत्तराची बाटली, केळी १ डझन, तांब्याचे गडवे ३, ताम्हण २, पाट ४, चौरंग १, वेगवेगळी ५ फळे.
.
महाप्रसाद
गव्हाचा रवा, साखर, साजूक तूप, प्रत्येकी सव्वा प्रमाणात सव्वा पावशेर अथवा सव्वा किलो प्रमाणात, पाव किलो पासून प्रसाद करावा त्यावर सव्वा केळी कुस्करुन घालावीत. याशिवाय महानैवेद्यासाठी गोड स्वयंपाक करावा.
.
सत्यनारायण पुजेची मांडणी
.
स्वच्छ जागेवर शक्यतो पूर्व पश्‍चिम चौरंग मांडावा.
त्या भोवती रांगोळी काढून त्यात गुलाल अथवा रंग भरावा.
आवडीप्रमाणे रोषणाई करावी. चौरंगाला चारी बाजूंना केळीचे अथवा कर्दळीचे खुंट बांधावेत. चौरंगावर मागील बाजूस सत्यनारायणाचा फोटो उभा ठेवावा. चौरंगावर गहू किंवा तांदूळ पसरावेत, उजव्या बाजूला चौरंगावरच मुठभर तांदूळ ठेवून त्यावर गणपतीचे प्रतिक म्हणून पांढरी सुपारी ठेवावी. मधल्या तांदूळ किंवा गव्हावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात गंध, फुले, अक्षता, सुपारी, दुर्वा व एक नाणे, आंब्याचा डहाळा ठेवावा, त्यावर विड्याची ५ पाने ठेवावीत.
कलशावर हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत, छोटे स्वस्तिक चिन्ह काढावे. त्या कलशावर ताम्हण ठेवावे. ताम्हणात तांदुळ किंवा गहू पूर्ण भरावेत. मध्यभागी एक सुपारी मांडावी. (वरुणाचे प्रतिक) आठ दिशांना आठ लोक पालांच्या सुपार्‍या मांडाव्यात.
लोकपाल येणेप्रंमाणे - पूर्वेस इंद्र , पश् ‍ चिमेस वरुण , दक्षिणेस यम , उत्तरेस सोम , आग्नेयेस अग्नि ,नैऋत्येस - निश्वति , वायव्येस - वायु , ईशान्येस - इशान ; त्याचप्रमाणे नवग्रहांच्या सुपार् ‍ या मांडाव्यात .
पुजेसाठी बाळकृष्ण अथवा शाळी ग्राम घ्यावा . शाळीग्राम असेल तर अक्षता वाहू नयेत , तुळशीपत्र वहावे . बाळकृष्णाला अक्षता वहाव्यात . चौरंगावर डावीकडे पाच विडे मांडावेत . प्रत्येक विड्यावर एक हळकुंड आणि खारीक ठेवावे . डावीकडे समई ठेवावी .
तांदूळावर ठेवलेल्या सुपारी गणपती मागे शंख ठेवावा .
.
पूजन प्रारंभ - सुहासिनीने हळद-कुंकू लावावे, यजमानानी पुजेला बसल्यानंतर विडे घेऊन पळीत पाणी घ्यावे. विड्याच्या दोन पानावर अक्षता, पैसा व सुपारी ठेवावी. आपल्या कुलदैवतासमोर विडा ठेवून त्यावर एक पळी पाणी सोडावे देवाला नमस्कार करावा. घरातील थोर मंडळींना नमस्कार करावा, गुरुजींना नमस्कार करुन आपापल्या आसनावर बसावे आणि पुजेला प्रारंभ करावा.

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

खंडोबा महाराज तळी

खंडोबा महाराज तळी आरति||
॥ जय मल्हार ॥
बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥
सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती करी॥ देवा ओवाळी ॥
नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥
हि आरती श्री खंडोबा महाराजांची तळी भरतांना संपुर्ण महाराष्ट्रात बोलली जाते.