रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

दृष्टीकोन

आयुष्याचे गणित चुकले

असे कधीच म्हणू नये .

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते,

चुकतो तो चिन्हांचा वापर...!

बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार

हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि

उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी बेरीज करायची,

कुणाला केंव्हा वजा करायचे ,

कधी कुणाशी गुणाकार करायचा

आणि भागाकार करताना

स्वतः व्यतिरिक्त किती

लोकांना सोबत घ्यायचे हे

समजले कि उत्तर मना-जोगते येते..!

आणि मुख्य म्हणजे

जवळचे नातेवाईक,मित्र

आप्तेष्ट यांना हातचा समजू नये ,

त्यांना कंसात घ्यावे!

कंस सोडविण्याची हातोटी

असली कि गणित

कधीच चुकत नाही ........!! ��

आपल्याला शाळेत त्रिकोण,

चौकोन, लघुकोन,

काटकोन, विशालकोन

इत्यादी सर्व शिकवतात..

पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो

तो कधीच शिकवला जात नाही.

तो म्हणजे "दृष्टीकोन"

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला,
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील..
आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण 'सुख दुःखाचे' accounts कधी जमलेच नाही...
जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की 'आठवण' सोडून काहीच balance उरत नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा