प्रेरणादायक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेरणादायक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ एप्रिल, २०१६

प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या

प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या आणि यशस्वी व्हा.

शिक्षणामूळे व्यक्तीची , समाजाची व अनुशंगाने देशाची प्रगती होत असते. यासाठी बरोबर दिशा देणारा पालक व समाज  ही असावा लागतो. 

आयुष्यात यशस्वी होण्याची असंख्य कारणे असतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला मिळणारं यश हे त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द , आत्मविश्वास , चिकाटी , आवड , ज्ञान अश्या महत्वपूर्ण गोष्टीमुळे प्राप्त झालेलं असतं. यश हे सहजा सहजी कधीच मिळत नाही. ते मिळवण्याकरता प्रत्येक व्यक्तीला खडतर प्रवास करावाच लागतो. अर्थात, ह्या सर्व गोष्टी साध्य करण्याची क्षमता त्या व्यक्ती मध्ये असायला हवी. यशाकडे वाटचाल करत असतांना आपल्याला बऱ्याचदा एक गोष्ट पाहायला आणि अनुभवायला मिळते आणि ती म्हणजे कमतरता. आणि ही कमतरता नेहमी कष्ट, जिद्द किंवा आत्मविश्वास यांचाशीच निगडीत असते असे नाही. कधी कधी असंही होतं की सर्व व्यवस्थित चालू असूनही यश मिळण्याची खात्री मनाला वाटत नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत असतं आणि आपल्याला काय कमी पडतंय नेमकं हेच कळत नसतं.

असं का होत असेल बरं ? आपण कुठे कमी पडतो का ? आपले प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वास ह्याची ताकद कमी होऊन जाते का ? की आपल्यात मुळात तेवढी क्षमताच नसते यशा पर्यंतची वाटचाल करण्याची ? प्रश्न अनेक पडतात पण उत्तर सापडत नाही. असा कटू अनुभव बहुतांशी लोकांच्या वाट्याला येतो आणि ते यशस्वी व्हायचे राहूनच जातात. मग, ही यशस्वी लोकं यश मिळवतात तरी कशी ? फार कुतूहल वाटतं ना?

पण यातच तर आपल्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत.

खरं तर यशाकडे जातानाचा प्रवास हा एकट्याचा नसतो.
यशाची वाटचाल करताना सोबत ही हवीच. आणि सोबत अशी असावी जी नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील.
प्रेरणा. ......
ह्याच गोष्टीची कमतरता असते बहुतांशी लोकांकडे. बाकी सर्व गोष्टी असल्या मात्र यशापर्यंत जाण्याची प्रेरणाच मिळत नसेल तर सर्वच अशक्य वाटू लागते. म्हणूनच मनात आशेचा दिवा तेवत ठेवण्यासाठी एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जवळ असणं फार महत्वाचं असतं.
पण प्रेरणा मिळते कशी ? की ती घ्यावी लागते ? आता ही गोष्ट मात्र नशिबानेच घडते.
प्रेरणा देणाऱ्या लोकांची साथ काहींना मिळते तर काहींना नाही मिळत. ज्यांना मिळते ते वाटचाल करत राहतात, ज्यांना मिळत नाही ते एक तर शोध घेतात किंवा थांबून जातात. खरं तर आपल्याला कोणीतरी प्रेरणा द्यावी, किंवा ती मिळावी अशी अपेक्षा करणे चुकीचे वाटते. प्रेरणा ही शोधली तर नक्कीच सापडते कारण जगात असंख्य गोष्टी आहेत ज्यांपासून आपण प्रेरणा घेऊ शकतो.

ज्या पासून आपल्याला प्रेरणा मिळते त्याला म्हणतात प्रेरणास्थान.

प्रेरणास्थान फक्त व्यक्तीच असते असे नाही तर ते काहीही असू शकते. सजीव, निर्जीव, व्यक्ती, निसर्ग, किंवा अशी कोणतीही गोष्ट जीच्याकडे पाहून आपल्याला नवीन उमेद मिळते, पुढे जाण्याची आणि यश मिळवण्याची. एखाद्यासाठी एखादं गाणं, तर एखाद्यासाठी एखादा चित्रपट प्रेरणादायी असू शकतो,
सुंदर आयुष्य जगण्यासाठी पण प्रेरणा लागते.
एखाद्या साठी त्याचे आई, बाबा, मित्र, नातेवाईक,  समाज बांधव  प्रेरणादायी असू शकतात  तर एखाद्यासाठी सकाळी बागेत फुलणारं फुलही प्रेरणादायी असू शकतं. काहींना बाहेरील गोष्टीकडून प्रेरणा मिळत नाही त्यामुळे ते स्वतः मध्ये प्रेरणा मिर्माण करतात आणि यशस्वी होऊन दुसऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनतात. प्रेरणा कुठून आणि कशा स्वरुपात मिळतेय हे महत्वाचं नसतं मात्र प्रेरणा मिळणं आणि मिळत राहणं फार महत्वाचं असतं.
तसेच प्रेरणा देण्याचे कर्तव्य करणे हे जागरूक समाजाचे ओळख आहे.
प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या आणि यशस्वी व्हा.
     मित्र हो एक जागरूक पालक, मित्र, नातेवाईक,  समाज बांधव म्हणून आपण हे आपले कर्त्तव्य करतोय का ?
  प्रेरणा देण्याचे कर्तव्य आपण करत असालच .... अन विसरले असाल तर आठवण करुन देण्याचा हा छोटाचा प्रयत्न...
 ������������������������������

संकलित

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

प्रेरणादायक -यशोगाथा एका बेफाम जिद्दीची

यशोगाथा एका बेफाम जिद्दीची
राधाबायींची ( लंडन मधील मराठी खानावळीची ) !
मित्रांनो मराठी असाल तर नक्कीच शेअर करा !
राधाबाई यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक
निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व
दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लंड वरून तिच्याच
समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि
नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे
लग्न करणे भाग होते. मग कोणा एका मध्यस्थाने या दोघांचे
लग्न लाऊन दिले.
वर्ष १९४८/४९ नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला.
बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना
नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी
हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब
संसार चालू राहिला.
एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त
होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच
घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे
आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले ते हि ऐन
हिवाळ्यात. बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली,
एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द यावर हि
अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई……… लंडन च्या बर्फात
सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू
माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत
तुला काय येते विचारले. हि म्हणाली "स्वयंपाक". त्याने
हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि
म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ
खायला.
..........आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन
मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर
त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला
गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी
कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे
होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली
कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस
मिळायचा नाही. पु ल, अत्रे, यान पासून अनेक मराठी
दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास
करीत (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या) स्टेशन
ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत
आणि मोजून उतरत.
बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे
होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले
पहिले देऊळहि त्यांनीच बांधले.
त्यांच्या अंतयात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडन चा
मेयर हजर होता......... आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या
शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी
सही करीत.
लेख सहाय्य - गुगल
तात्पर्य = कोणतेही कामाचा दर्जा हा चांगला किंवा
वाईट नसतो तर तुमची जिद्द नि त्या कामा बद्दलची
तुमची निष्टा त्या कामाला उत्तम दर्जा प्राप्त करून देते.
व्यवसाया प्रती समर्पित भावना, चिकाटी , प्रामाणिक
पणा या गोष्टी अडचणीना दूर सारून यशाला खेचून
आणतात. एवढेच नाही तर यश मिळवायला त्या नेहमी
प्रेरणा देतात. मग देश आणि परिस्थिती कोणतीही असो
विजय हा तुमचाच असतो.

हि माहिती प्रेरणादायक ठरो ।