दावा किती साधा अन सरळ शब्द आहे.
पण या साद्या शब्दाची दाहकता मात्र फार तिव्र आहे.
या शब्दाच्या भयानकतेचे चटके बहुतेकांनी येनकेन प्रकारे अनुभवलेच असतिल.
दावा हा शब्द फिर्यादिशी निगडित आहे.
कोर्टात फिर्याद देणे म्हणजेच दावा दाखल करणे होय.
एकदाका दावा दाखल झाला तर मग देवालयापेक्षा कोर्टाच्या फेय्राच जास्त होतात.एवढेच नाही तर वकिलाची फी भरतांना चांगल्या मातब्बरांची भंबेरी ऊडाल्याची ऊदाहरणे आहेत.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे जुन्या जाणत्यांनीच नमुद करून ठेवले असून अपेक्षा भंगाचे दुःख पेलवण्याची ताकद असेल तरच दावा दाखल करावा.
अन दुसरा दावा म्हणजे दावा करणे.
म्हणजे आत्मविश्वासपूर्वक ठाम बोलणे.
बय्राच मंडळींना दावा करण्याची वाईट सवय असते.
काहीतर मानवाला पशूच्या पदव्या सहज देवून त्याच्या पराक्रमाची गाथा ऊभी करतात.
गाढवापासून सिंहा पर्यंतच्या पदव्या सहजगत्या दावा करणारे देत असतात.
हे दावा करणारे नेहमी कुणालातरी कमी लेखतिल व कुणाला केव्हा डोक्यावर घेतिल याचा अंदाजच येत नाही.
अर्थ तज्ञापासून मानवाच्या कल्याणा पर्यंतचे दावा करणारे या जगात आहेत.
मात्र यांचा दावा केव्हा फोल ठरेल वा ठरविला जाईल याचे भान दावा करणाय्रांना नसते.मिडीयाद्वारे प्रसिद्धिच्या झोतात रहाणे एवढाच या दावा करणाय्रांचा ऊद्देश असतो.
दावा करण्यात नेते मंडळिंचा हात कुणीही धरू शकत नाही.
त्यांच्या दाव्याला भुलून च त्यांचे भक्तगण नेत्याच्या मागून फरपटत जात असतात.
एक वेळ कोर्टाचा दावा परवडला.पण दावा करणारा नेता परवडत नाही.
कोर्टातिल दाव्यात वैयक्तिक मुखभंग होतो.
पण या दावा करणाय्रा बरोबर अनेकांचा मुखभंग झाल्याशिवाय रहात नाही.
शुभ प्रभात!!
शुभ दिन!!!!!
जय शंभो!!!!!!!
मंगळवार, २४ मे, २०१६
दावा - श्री.भामरे आण्णा
गुरुवार, १९ मे, २०१६
फलित- भामरे आण्णा
फलित
भामरे आण्णा
आज निळकंठ पत्रिकेचे आगमन झाले.
मुखपृष्ठ मा.मधुकर टंकसाळे साहेबांच्या लेखाने व़्यापलेले.
विषय होता गुरव जाती समाज संघटन.
लेखात जाती च्या व्याप्ती विषयी निर्मीती पासून ऊत्कर्ष वा हानी पर्यत एकेक पैलू ऊलगडले असल्यामुळे समाज जाग्रुतीसाठी अतिशय बोधप्रद.
त्या पैलूंपैकी एका पैलूने मला वडिलांनी केलेली चर्चा आठवली.
गुरव हा महादेव परिवाराचा पुजारी.
पण या समाजाने ऊचनिचतेचा सिद्धांत स्विकारण्याचा विचार केला.
व
गुरव हा ब्राम्हणच सिद्ध करण्यापायी समाजातही विभागणी झाली.
अनेक शाखांपैकी फक्त शैव गुरवांनीच या मुद्यावर भर दिला व ईतर विषयांपासून ईतर शाखा अलिप्त राहिल्या.
त्यात अहिर गुरवांनचा ईतिहास कालानुरूप बदल कसा स्विकारत गेला ते ही आजच्या विज्ञान युगात एक प्रकारे हितकारकच ठरले असे म्हणावे लागेल.
राणाप्रतापांचा पाडाव झाल्यानंतर राजस्थान मधून बरिच मंडळी सैरावैरा पळत सुटली त्यात गुरव ही होते.
चितोडगड गेले नंतर निमच मंदसौर मार्गे रतलाम ऊज्जैन देवास ईदौंर खंडवा करत ही मंडळी अहिर राज्यात प्रविष्ट झाली.
कठिण कर्मकांड करणारा गुरव या खडतर प्रवासात एकेक कर्मकांड कमी करत गेला.मुंज हा विषय रस्त्यातच बाद झाला.
मंदिरे नाहित पोट कसे भरणार मग मिळेल त्या गावात एकेक दोन दोन परिवार थांबत गेला .व गावात जे ही छोटे मोठे मंदिर ; बेलपत्री व वांजत्रीचा व्यवसाय करत करत सोबत मजुरीही करत जीवण कंठत गेला.
अहिर राज्यातिल रहिवासी म्हणून अहिर गुरव म्हणून प्रसिद्धीस पावला.
वर्षामागून वर्षे गेली .ऊज्जैनला शर्मा म्हणून दक्षिण मध्यप्रदेशात नेमाडी व उत्तर महाराष्ट्रात अहिर म्हणून जगणारा हा गुरव .स्थिरत्व प्राप्ती नंतंर आज गुरव समाज ऊन्नती संस्थेच्या माध्यमातून झोय्रा पंचायतितून बाहेर पडला व एकसंघ भावनेतून वाटचाल करता झाला.विसाव्या शतकात गुरव हा ब्राम्हणच हा वाद सुरू झाला.
मात्र स्थानिक परिस्थीतीशीच अनुकूलता दर्शवत झोय्रा पध्दतिच्या नेत्यांनी या वादा पासून अलिप्त रहाणेच पसंत केले.
ऊज्जैनच्या एका कार्यक्रमात गुरव ब्राम्हण बोर्ड पहाता मलाच भाषणाद्वारे जाणीव करून द्यावी लागली की;गुरव ही आपली जात असतांना हा रिकामा ब्राम्हण होण्याचा हव्यास कशासाठी.
आपण आपला गुरवकीचा व्यवसाय नैतिक द्रृष्ट्या केला तर कुणीही तुमच्या कडे बोट दर्शवणार नाही.
जीथे मंदिरे आहेत त्याचे ऊत्पन्न आज ईतरांच्या डोळ्यात सलते तर आपणही कर्तव्य भावनेने काही ऊत्पन्न मंदिर वा परिसर विकासासाठी खर्च केले तर ईतर भाविकही गुरवांची बाजू सांभाळतात.हेही विसरून चालणार नाही.
टंकसाळे साहेबांनी या वादातित विषयाच्या मर्मावरच बोट ठेवल्या मुळे अक्षरशा म्हणावेसे वाटते की ---
या ब्राम्हण होण्याच्या नादापायी तिसेक वर्षाचा जो काळ गेला त्यात समाजाची प्रगती न होता अधोगतीच झाली.व गुरव एकसंघ न होता शाखिय दुरावा वाढला तो या लोकशाहितही अस्तित्वात आहेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.