आध्यात्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आध्यात्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

देवी नवरात्र


देवीचे शारदीय नवरात्र जवळ आले आहे त्याबद्दल आपण धर्मशास्त्रीय माहिती आज पाहुयात                                              
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास *शारदीय नवरात्र* असे म्हणतात.                               
  नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पळाला गेला पाहिजे .  आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे , त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.   अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम रावण युद्धातही  रावणाच्या वधा साठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते.        
 
*नवरात्र व्रताचे प्रकार:-*  
१)प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र
२) प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत
३) पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत 
४) सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत         .                                                          
 
*नवरात्रीचे अंगे:-*
 नवरात्रीचे प्रमुख ४ अंगे आहेत.
*१) देवता स्थापन
२) माला बंधन
३) नंदादीप (अखंड दीप)
४) कुमारिका पूजन*
    हि आहेत.काही जणांकडे (वेदिका) शेत स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून  त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी .तेलाची जोडवात एक वित लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात. नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप करावा किंवा विष्णूसहस्रनाम वाचावे .                   
 नवरात्रात माला बंधन करताना (माळ बांधताना)त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी .                                       
*कुमारिका पूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे*                       
शक्य असल्यास नवरात्र संपे पर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे.                       
 *स्कंद पुराणात तिच्या वया नुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत.*                                               *२ वर्षाची- कुमारी /
३वर्षाची -त्रिमूर्तीनी /
४ वर्षाची -कल्याणी /
५वर्षाची - रोहिणी /
६ वर्षाची -काली /
७ वर्षाची -चंडिका /
 ८ वर्षाची -शांभवी /
९ वर्षाची - दुर्गा / व
१० वर्षाची - सुभद्रा*  
                       ,   ,                                                
 *कुमारिका पूजनाचे फळ पुढील प्रमाणे:-- 
१ कुमारिका पूजन- ऐश्वर्य प्राप्ती /
२ कुमारिका पूजन-- भोग व मोक्ष प्राप्ती /
३ कुमारिका पूजन -- धर्म व अर्थ प्राप्ती /
४ कुमारिका पूजन-- राज्यपद प्राप्ती /
५ कुमारिका पूजन-- विद्या प्राप्ती /
६ कुमारिका पूजन--षट् कर्म सिद्धी /
 ७ कुमारिका पूजन---राज्य प्राप्ती /
८ कुमारिका पूजन--संपत्ती /
 ९ कुमारिका पूजन--पृथ्वीचे राज्य मिळते.*
            नवरात्रात सप्तशती  पठणाचे विशेष महत्व आहे . सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नी सामान आहे.मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करिन. सर्व शांतिकर्म - - दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील  असे देवी माहात्म्य सांगते. राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे. अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते , तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.
*नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ,ते पुढील प्रमाणे:-*      
 रविवारी -पायस(खीर) /
सोमवारी -गायीचे तूप /
 मंगळवारी -केळी /
बुधवारी -- लोणी /
गुरुवारी --खडीसाखर /
शुक्रवारी -- साखर /
शनिवारी --गायीचे तूप .......      
          नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र वाचन /महालक्ष्मी अष्टक / कनकधारा स्तोत्र /रामरक्षा / देव्यपराध स्तोत्र / श्रीसूक्त /शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्याद स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा
.१)सात्विक अन्नाचे सेवन (शक्यतो परांन्न वर्ज्य करावे)
२) ब्रम्हचर्य पालन ३) दाढी व कटिंग करू  नये
४) गादीवर पलंगावर न झोपणे .
*नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो.*     
 *।।इति धर्मशास्त्र निर्णय:।।* 
              *।।जय श्रीराम।।*
                                         
 

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखांक १ ते २

प्रश्न : - *आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे ,त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय* ???
असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात ,त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो...
कृपया नक्की काय असते समजावलेत तर बरे होईल ...
 
 || मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
[ *लेखांक १ ला* ]
प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे.
         यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात . अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ .
अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या वेक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहीलेला नाहि तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात . आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळुन टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो , यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात , अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छाद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात तेव्वा त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात .( आता नवरा जिवंत किवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो ) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात याला अश्मा असे म्हणतात . त्या नंतर प्रेताळा जाळले जाते .
   आत्मा हे सगळं पहात असतो , त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते , त्याला रडायला येते , ( येथे आशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का ? तर आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे व यात मनोमय कोष असल्यामुळे वासना , भावना असतात ) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो , तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात , दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.
घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात.घरातिल माणसं अंघोळ करुन पिढलभात खायला मोकळी होतात ........
पुढे काय होते ...?
क्रमश....
पुढील लेखात पाहू
 
 || मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
 
|| *लेखांक दुसरा* ||
 
कालच्या लेखात आपण पाहीले की, प्रेताला अग्नी देऊन सगळे घरी येतात, अश्मा घराबाहेर ठेवतात , आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघुन जातात व घरातील मंडळी पिठलं भात खावुन दुःख करित बसतात . पुढे------++--
अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर , गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे.लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत.
आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक , आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो.
त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक , मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो , ऐकत असतो.आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं .
या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासगट करावं .
दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी मिशा व डोक्यावरील केस काढावेत , या घाटावर जो विधि केला जातो
तो म्हणजे काय असतो ? या आत्म्याचा प्रवास कसा सुरु होतो व त्याचे पुढे काय होते ते उद्या पाहु ****
क्रमशः -
 
राष्ट्रीय कीर्तनकार
*हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी*

शनिवार, २१ मे, २०१६

हनुमान आला कुठून ?

*
*सर्वमान्य असं हे हनुमानाचं रूपआलं कुठून?*
*डॉ. गो. ब. देगलूरकर*
��������

थेट जनमानसात खोलवर रुजलेली अशी ही देवता  सर्वच स्तरांमध्ये दिसून येते. सर्वमान्य असं हे हनुमानाचं रूप आलं कुठून? त्याच्या मूर्तिरूपातून त्याची कोणकोणती वैशिष्टय़ं आढळतात? त्यातून या देवतेविषयी नेमकं काय समजतं ?
हनुमान हे एक लोकप्रिय दैवत आहे. उपदेवतांमध्ये त्याची गणना होत असते. श्रीरामाचा प्रमुख सेवक म्हणून तो ओळखला जातो. तो शक्ती, भूत, प्रेत, पिशाच्च यापासून सुटका करणारा मानला जातो. तंत्रात त्याला स्थान आहे. हनुमान, अंजनेय, महावीर, महाबली इत्यादी त्याची नावं आहेत. गावोगावी आणि गावाबाहेर झाडाखाली आणि ओटय़ावर शेंदूरचर्चित अशी मारुतीची मूर्ती सामान्यत: महाराष्ट्रात सर्वदूर पाहायला मिळते. मारुतीचं महत्त्व लोकप्रिय करण्याचं काम उत्तरेत तुलसीदासांनी आणि दक्षिणेत समर्थ रामदासांनी केलं.
वाल्मीकी रामायण, महाभारत, पुराणे इत्यादी साहित्यग्रंथांतून मारुतीची माहिती उपलब्ध होते. पण प्रत्येक ग्रंथात त्याच्या मूर्तीचं वर्णन आलेलं असतंच असं नाही. हनुमानाचं वर्णन आलेलं असतं, त्याच्या जन्माच्या कथा आलेल्या असतात. अशा कथा सर्वसामान्यपणे आपणास माहीत असतात. त्याचे आई-वडील अंजनी आणि केसरी यांचा तो पुत्र. पण ही पुत्रप्राप्ती त्यांना वायूपासून किंवा शिवापासून झाली आहे अशी कल्पना आहे. त्याला हनुमान का म्हणायचे, तर इंद्राशी त्याची झटापट झाली, तेव्हा इंद्राचं वज्र हनुमानाच्या हनुवटीला लागून तुटलं असं मानलं जातं. भागवत पुराणात त्याला किन्नर म्हटलं आहे. शरीर मानवी आणि चेहरा माकडाचं म्हणून कदाचित असं म्हटलं गेलं असावं. त्याला ताम्रमुख असंही म्हटलं गेलं आहे कारण त्याचं तोंड तांबडं असावं अशी कल्पना आहे.
मारुती हा मल्लयुद्धात, गदायुद्धात निष्णात होता. तो विज्ञान होता आणि संगीततज्ज्ञही होता असा पद्मपुराणात उल्लेख आहे. त्याच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. जन्मत:च तो सूर्यावर झडप घालतो अशीही कथा आहे. राम रावण युद्धात लक्ष्मणाला जीवदान देण्यासाठी त्याने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला अशीही कथा आहे. त्याशिवाय काही ठिकाणी अशीही कथा ऐकायला मिळते की शत्रुघ्नाला वाचवण्यासाठी त्याने क्षीरसागर तंत्राने द्रोणाचल आणला होता.
मारुतीच्या प्रतिमा नाण्यावरदेखील पाहता येतात. कलचुरी, चंडेल यांच्या नाण्यावर ११ व्या शतकात मारुतीचे अंकन झालेले आहे. पृथ्वीदेव कलचुरीच्या नाण्यावर चतुर्भुज, गदाधारी असा हनुमान आहे. यादवांच्या राजमुद्रेवर हनुमान तर  आहे. तसेच कदंब, होयसळ यांच्या राजचिन्हावर हनुमान आहे. विशेष म्हणजे अर्काटचा मुस्लिम राजा महमद अली वलजा यानेदेखील हनुमान चिन्हाचा उपयोग केला होता.
मूर्तीकलेत जो हनुमान पाहायला मिळतो तो इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकानंतर मिळतो. गुप्तपूर्व काळात रामकथेतही अंकन मिळत नाही. कथा मिळते पण अंकन मिळत नाही. त्यामुळे हनुमानाचं अंकनही मिळत नाही. त्याच्या प्रतिकृतीचं वर्णन अर्जुनाच्या रथावर असल्याचं आपणास महाभारतात मिळतं. पण ती त्याची प्रतिकृती आहे. मूर्ती नाही.
गुप्त काळ आणि गुप्तनंतरच्या काळात दिसतो तो देवगड, नचनाकुठार, चौसा (बिहार) या ठिकाणी शिल्पांकित केलेल्या रामकथांमधून. पण पूजावह अशी मूर्ती आठव्या शतकात मिळते. ज्या मूर्तीची पूजा व्हायला लागली अशी मूर्ती तेव्हा प्रत्यक्षात आली. तो प्रतिहार राजांचा काळ आहे. म्हणजेच आठव्या शतकातला. अशी मूर्ती आता लखनौच्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळते.
राजस्थानात चितौडगड येथे याच काळातील मूर्ती प्राप्त झाली असून ती आत्ता दिल्लीच्या वस्तूसंग्रहालयात आहे. इस ९२२ च्या खजुराहो येथील शिलालेखात मारुतीच्या मूर्तीचा उल्लेख आहे. नंतर मग वर उल्लेखलेल्या राजांच्या काळात नाण्यांवरील मूर्ती दिसते.
उत्तर मध्ययुगीन काळातील मूर्ती ११-१२ व्या शतकात दिसून येते. त्या काळातील मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यात वनमाला आहे, क्वचित यज्ञोपवीत आहे, लांब गुंडाळलेलं शेपूट आहे आणि ही मूर्ती चपेटदान मुद्रा स्वरूपात आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे हात उंचावलेला, चापट मारण्याच्या स्थितीतील मूर्ती. अशा मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो, तर काही ठिकाणी त्याच्या पायाशी राक्षसीणदेखील दिसून येते. याबद्दल असे म्हटले जाते की ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. बंगालमध्ये, पन्हाळ्याच्या पायथ्याला, बीड येथे अशा मूर्ती आहेत. या राक्षसीणीला तिथे पनवती म्हणतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगालमध्ये साडेसातीला पनवती शब्द आहे. हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे ती राक्षसीण दाखवलेली आहे असे मानले जाते. वस्तुत: शनिवार आणि मारुतीचा काहीही संबंध नाही. पण मग शनिवारी का मारुतीची पूजा करतात, तर मारुती साडेसातीला पायाखाली ठेचतो, नियंत्रण करतो म्हणून त्याची पूजा केली जाते. बंगालमध्ये अशा मूर्ती अधिक ठिकाणी पाहायला मिळतात.
दक्षिणेला काही ठिकाणी मारुतीच्या शेपटीला लोणी लावतात. लंकादहनाच्या वेळी त्याचं शेपूट भाजलं असणार, तो दाह कमी व्हावा म्हणून लोणी लावण्याची प्रथा असावी असे मानले जाते. नाशिकला गंगाघाटावर राजेबहाद्दरांचं मारुतीचं देऊळ आहे. त्यात मारुतीच्या शेपटीत एका महिलेला गुंडाळलेलं दाखवलं आहे. ती हीच पनवती म्हणजे राक्षसीण.

*मारुतीचे मूर्ती प्रकार*

*वीर मारुती –* वीरासनात बसलेला, एक गुडघा जमिनीला टेकवलेला आणि एक उंच केलेला. पटकन उठता येईल अशा पोजमध्ये बसलेला असतो. त्याच्या हातात गदा असते.

*दास मारुती –* हात जोडून उभा असलेला. सेवेसी तत्पर असा दक्ष हनुमान.

*रामसेवक मारुती –*  दोन्ही खांद्यावर राम लक्ष्मणाला घेऊन निघालेला असतो. रामाची सेवा करतो म्हणून दास मारुती. कधी कधी केवळ रामच खांद्यावर असतो.

*मिश्र मूर्ती –* पाय जुळवलेले आणि हात जोडलेले, म्हणजे हा भक्त मारुती झाला. त्याला दोनच हात असले तरी त्याला धनुष्यबाण, ढाल, तलवार दाखवलेले असते. वीर आणि भक्त मारुतीची सांगड घालणारी ही मूर्ती.
योगी मारुती – योगांजनेय (अंजनी + योगी)

*वार्ता विज्ञापन करणारा हनुमान* वार्ताहर हनुमान म्हटलं तरी चालेल. विमानअर्चनाकल्प ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. उजवा हात तोंडावर ठेवून, डाव्या हातात वस्त्राचा काठ धरून उभा असतो आणि श्रीरामाला बातमी सांगत असतो. गुप्तपणे एखादी बातमी सांगण्याचा जो आविर्भाव असतो तसा आविर्भाव या मूर्तीत असल्यामुळे तो तोंडावर हात ठेवून उभा असतो.

*वीणा पुस्तकधारी हनुमान –* मारुतीला संगीत आणि गायनाचीदेखील देवता मानले जाते.  मारुती चांगला संगीत-गायनतज्ज्ञ होता. या मूर्तीच्या उजव्या हातात वीणा आणि डाव्या हातात पोथी असते. हा दक्षिणेत आंध्रात पाहायला मिळतो. आंध्रात चतुर्भुज मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.

*पंचमुखी मारुती –* हा महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मुख्य तोंड वानराचे, सिंह, गरुड एका बाजूला आणि  दुसऱ्या बाजूला वराह आणि अश्व यांचे मुख असते. या संदर्भात एक कल्पना अशीही आहे की वैकुठांची मूर्ती आहे त्यालादेखील सिंह, वराह, अश्व, गरुड यांचे तोंड असते. मधले तोंड हे वासुदेवाचे असते. येथे वानराचे आहे. त्यामुळे यावरून या मूर्तीची संकल्पना घेतलेली असावी असा समज आहे.
महाराष्ट्रातील मारुतीची देवळं सर्वसाधारणपणे लहान असतात. आंध्र आणि कर्नाटकात खूप मोठमोठी मंदिरं आहेतच, पण मारुतीची मूर्तीदेखील ५० फुटापर्यंत उंच असते. या मूर्तीना लिंबाचा हार घातला जातो. दक्षिणेत हनुमानाचा इतका प्रसार होण्यामागे आणि इतक्या भव्य मूर्ती असण्याचे ठोस असे कारण मिळत नाही. पण असा अंदाज मांडता येतो की मारुती हा दक्षिणेतला आहे. विजयनगरचे जे साम्राज्य होतं, त्यातील हंपीजवळ किष्किंधानगरी आजही दाखवली जाते. त्या ठिकाणी मारुतीची आणि रामाची भेट झाली असे वर्णन आहे. राम-लक्ष्मण जेव्हा सीतेच्या शोधात भटकत होते, तेव्हा वालीने त्या दोघांचा कानोसा घेण्यासाठी मारुतीला पाठवलं होतं. मारुती हा राजकारणचतुर असा होता. त्याची रामाची ती पहिली भेट. रामायणातील मारुतीचे सारं कथानक हे दक्षिणेतच घडलं आहे. त्यामुळे जेथे त्याने कर्तृत्व गाजवले तेथे त्याचा सन्मान होणं साहजिकच म्हणावं लागेल. उत्तरेत तुलसीदासांनी मारुतीला महत्त्व आणून दिलं. पण तेथील देवळंदेखील लहानच आहेत.
मारुतीच्या मूर्तीचं ठळक वैशिष्टय़ मूर्तीशास्त्रानुसार काय मांडता येईल, तर मारुतीच्या मूर्ती एक तर ती वानरमुखी असते, कमरेला गुंडाळलेलं शेपूट असतं. या दोन गोष्टी दुसरीकडे कोठेच येत नाहीत. त्याशिवाय वेगळं असं काही वैशिष्टय़ नाही. एखाद्या ठरावीक काळातील मूर्ती ही त्याच्या हातातील शस्त्राच्या काळानुसार ती मूर्तीचा काळ ठरवता येतो. म्हणजे जर त्याच्या कंबरेला जंबिया खुपसलेला असेल तर ती अकराव्या- बाराव्या शतकातील मूर्ती असे म्हणता येईल.
शेंदूर फासलेला मारुती ही प्रतिमा आपल्याकडे खोलवर रुजली आहे. शेंदुरचर्चित प्रथा कोठून आली, असा एक प्रश्न पडू शकतो. शेंदुराबाबत फार चर्चा करता येणार नाही. शेंदरामागे कारण असे असावे की मारुती, गणपती, देवीचे तांदळे आणि म्हसोबा यांचे केवळ दगड ठेवणं असं स्वरूप राहू नये. त्याला एक विशिष्ट स्वरूप यावं, एक रूप यावं म्हणून त्या काळी जो रंग उपलब्ध होता त्यापासून हे रूप प्राप्त झालं.
मारुती असा पुराणातून, साहित्यातून, नाण्यातून, मूर्तीतून ठिकठिकाणी भेटतो. गुप्तपूर्व काळात मारुती आहे तो केवळ रामकथेत दिसतो तर आठव्या शतकातील वेरुळच्या कैलास लेणींमध्येदेखील रामकथा आहे. पण स्वतंत्रपणे मारुती नंतरच्या काळात आढळतो. गणपतीचे स्थानदेखील जनमानसात पाचव्या शतकापर्यंत नव्हतेच. दत्ताचेदेखील स्थान जनमानसात खूप नंतर आले. रामदासांनी मारुतीची मंदिरं स्थापन केली त्यापूर्वी मारुती होताच. पण साहित्य आणि शिल्पांमध्ये जेव्हा ते प्रकर्षांने जाणवायला लागते तेव्हाच ते लोकांपर्यंत पोहचते. समर्थानी त्याला बलोपासक म्हणून त्यावर भरपूर लिखाण केलंय. तसंच उत्तेरत तुलसीदासांनी भक्त मारुतीचं वर्णन केलं आहे.
आपल्या समाजात मारुतीचं स्थान अगदी सर्व स्तरांवर पोहचलेलं आहे. पण वेशीवरचा किंवा गावाबाहेरचा गावाचा रक्षणकर्ता मारुती यामागे नेमकं काय हे पाहावे लागेल. मूर्तिशास्त्रानुसार योग, भोग, वीर आणि अभिचारिक अशा चार प्रकारच्या मूर्ती असतात. त्यातील वीर प्रकारची मूर्ती असते ती मारुतीची, महिषासुरमर्दिनीची असते. गावाच्या रक्षणासाठी वीर प्रकारचीच मूर्ती असावी लागते.
थेट जनमानसात खोलवर रुजलेली अशी ही देवता आहे. तसाच तो सर्वच स्तरांमध्ये दिसून येतो. त्याची थोडक्यात कारणमीमांसा अशी आहे की, त्याला रुद्रावतारातील ११ वा रुद्र मानतात, त्यामुळे तो शैव झाला. रामपंचायतनातदेखील तो असतो, त्यामुळे तो वैष्णवांचादेखील आहे. गावाच्या बाहेर किंवा वेशीवर असल्यामुळे त्याला जातीपातीचे सोवळ्याओवळ्याचे काही बंधन नाही. शिवाय तो जनसामान्यांचा देव आहे. ज्यांना सामथ्र्य प्राप्त व्हावं असे वाटत असते त्यांचा देखील तो देव आहे. तो गावाचा रक्षक असल्यामुळे सारेच त्याची पूजा करतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मारुतीची उपासना सर्वदूर पसरलेली आहे. शैव-वैष्णव-शाक्त असा काहीही संबंध नाही.  ही देवता त्यापलीकडे आहे.
मग ही अशी देवता नेमक्या कोणत्या कालावधीत झाली असावी. त्यानुसार विचार करता, साधारण इ. पूर्व २५०० वर्षे अशी महाभारताची विद्वत्मान्य कालनिश्चिती जवळजवळ झाली आहे. त्याआधी रामायणाचा काळ होता असे म्हणता येईल. मारुती हा रामकथेत घुसडला गेला असेदेखील म्हटले जाते. पण जर वाल्मिकी रामायण मानणारा असेल तर तुम्हाला मारुती मानावा लागेल. मारुतीशिवाय रामायणकथा पूर्ण होतच नाही.

दि.:21/05/2016
*संदर्भ: 'दैनिक लोकसत्ता'  वृत्तपत्रातील लेख.*
✍:

कालसर्प योग शांति के उपाय

कालसर्प योग शांति के उपाय
कालसर्प एक ऐसा योग है जो जातक के पूर्व जन्म के किसी अपराध के दंड या शाप के फलस्वरूप उसकी जन्मकुंडली में विधमान होता है। जब कुंडली में सातों ग्रह राहु व केतु के बीच हों तो यह घातक कालसर्प योग बनता है। इसमें व्यक्ति आर्थिक व शारीरिक रूप से परेशान तो होता ही है, उसे संतान संबंधी कष्ट भीं होता है। उसको हमेशा आर्थिक संकट घेरे रहते है। उसे तरह तरह के रोग भी सताते रहते हैं। बनते कामों में बेवजह रुकावटें आती रहती है।ऐसे व्यक्ति को जीवन में बहुत उतार-चढ़ाव देखने को मिलते है ।

कालसर्प योग वाले बहुत से ऐसे व्यक्ति भी हो चुके हैं, जो अनेक कठिनाइयों को झेलते हुए भी ऊंचे पदों पर पहुंचे। जिनमें भारत के प्रथम प्रधानमंत्री स्व॰ पं॰ जवाहर लाल नेहरू, स्व॰ मोरारजी भाई देसाई व स्व॰ चंद्रशेखर सिंह भी कालसर्प से ग्रसित थे। किंतु वे फिर भी भारत के प्रधानमंत्री पद को सुशोभित कर चुके हैं। अत: किसी भी स्थिति में व्यक्ति को मायूस नहीं होना चाहिए और उसे अपने कर्तव्यों का पालन पूरे मनोयोग योग से करना चाहिए ।

मुख्य रूप से 12 कालसर्प योग माने गए है ।

1 अनंत कालसर्प योग
2 कुलिक कालसर्प योग
3 वासुकि कालसर्प योग
4 शंखपाल कालसर्प योग
5 पदम कालसर्प योग
6 महापदम कालसर्प योग
7 तक्षक कालसर्प योग
8 कारकोटक कालसर्प योग
9 शंखचूड़ कालसर्प योग
10 घातक कालसर्प योग
11 विषधर कालसर्प योग
12 शेषनाग कालसर्प योग

यदि कालसर्प योग का प्रभाव किसी जातक के लिए अनिष्टकारी हो तो उसे जीवन में सफलता हेतु इसके उपाय अवश्य ही करने चाहिए।

काल सर्प योग के उपाय के लिए सावन मास की बहुत महत्ता मानी गयी है । विशेषकर कल सर्पयोग के उपाय का अचूक समय सावन माह के शुक्ल पक्ष की पंचमी नाग पूजा का दिन अर्थात नाग पंचमी मानी गयी है।ज्योतिष शास्त्र के अनुसार पंचमी तिथि के देवता शेषनाग हैं। इसलिए यह दिन बहुत शुभ फल देने वाला माना जाता है। नागपंचमी के दिन कालसर्प दोष शांति के लिए नाग और शिव की विशेष पूजा और उपासना से जीवन में आ रही बाधाएं निश्चित ही दूर होती है ।

काल सर्प योग के उपाय नदी के किनारे या शंकरजी के मंदिर में किये जाने चाहिये। कालसर्प योग शांति के लिए उज्जैन में महाकाल और नासिक में त्रयंबकेश्वर सबसे सिद्ध स्थान माना गया है । काल सर्प योग से पीड़ित जातक को यथसंभव इन स्थानों पर जाकर दर्शन, पूजा अर्चना अवश्य ही करनी चाहिए ।

कालसर्प योग के कुछ बहुत ही आसान उपाय

* 108 राहु यंत्रों को जल में प्रवाहित करें।
* चौबीस मोर पंख लेकर उसकी झाडू बनवाकर इसे सदैव शयनकक्ष में रखे तथा प्रतिदिन राहुकाल के समय इससे जातक के शरीर पर झाड़ा लगाये।
* 40 दिन जौ के दाने पक्षियों को खिलाएं।
* घर की रसोई घर में बैठकर भोजन करें और बुधवार के दिन ताजी मूली का दान करें।
* अमावस्या के दिन पितरों को शान्त कराने हेतु दान आदि करें तथा कालसर्प योग शान्ति पाठ कराये।
* शयन कक्ष में बेडशीट व पर्दे लाल रंग के प्रयोग में लायें।
* हनुमान चालीसा का 108 बार पाठ करें और मंगलवार के दिन हनुमान पर सिंदूर, चमेली का तेल व बताशा चढ़ाएं।
* शनिवार को पीपल पर शिवलिंग चढ़ाये व शिव मन्त्र का जाप करें ।
* सवा महीने देवदारु, सरसों तथा लोहवान - इन तीनों को जल में उबालकर उस जल से स्नान करें।
* काल सर्प दोष निवारण यंत्रा घर में स्थापित करके उसकी नित्य प्रति पूजा करें ।
* सोमवार को शिव मंदिर में चांदी के नाग की पूजा करें, पितरों का स्मरण करें तथा श्रध्दापूर्वक बहते पानी में नागदेवता का विसर्जन करें।
* श्रावण मास में 30 दिनों तक महादेव का अभिषेक करें।
* लोहे का नाग नागिन का जोड़ा बनवाकर बहते पानी में बहायें।
* श्रावण के प्रत्येक सोमवार को शिव मंदिर में दही से भगवान शंकर पर - हर हर महादेव' कहते हुए अभिषेक करें।
* श्रावण मास में रूद्र-अभिषेक कराए एवं महामृत्युंजय मंत्र की एक माला रोज करें।
* सावन में शिवलिंग पर प्रतिदिन मीठे दूध में भाँग डाल कर चढ़ाएँ इससे गुस्सा शांत होता है, साथ ही सफलता तेजी से मिलने लगती है।
* किसी शुभ मुहूर्त में ओउम् नम: शिवाय' की 21 माला जाप करने के उपरांत शिवलिंग का गाय के दूध से अभिषेक करें और शिव को प्रिय बेलपत्रा आदि श्रध्दापूर्वक अर्पित करें। साथ ही तांबे का बना सर्प शिवलिंग पर समर्पित करें।
* कालसर्प योग में गायत्री मंत्र का जप करना चाहिए|
* अगर शत्रु से भय लगता हो तो चाँदी अथवा ताँबे के सर्प बनाकर उनकी आँखों में सुरमा लगाकर उसे शिवलिंग पर चढ़ा दें, इससे भय दूर होगा व शत्रु भी शांत हो जायेंगे ।
* यदि परिवार में क्लेश होता हो, आपसी प्रेम की कमी हो रही हो तो भगवान श्रीकृष्ण की मूर्ति जिसके सिर पर मोरपंखी मुकुट धारण हो घर में स्थापित करें एवं प्रतिदिन उनका पूजन करते हुए ऊँ नमो भगवते वासुदेवाय का यथाशक्ति जाप करे।
* किसी शुभ मुहूर्त में मसूर की दाल तीन बार गरीबों को दान करें।
किसी शुभ मुहूर्त में सूखे नारियल को बहते जल में तीन बार प्रवाहित करें तथा किसी शुभ मुहूर्त में शनिवार के दिन बहते पानी में तीन बार कोयला भी प्रवाहित करें
* मंगलवार एवं शनिवार को रामचरितमानस के सुंदरकाण्ड का पाठ श्रध्दापूर्वक करें।
* श्रावण महीने के हर सोमवार का व्रत रखते हुए शिव का रुद्राभिषेक करें। शिवलिंग पर तांबे का सर्प विधिपूर्वक चढ़ायें।
* शनिवार का व्रत करें और राहु,केतु व शनि के साथ हनुमान की आराधना करें। शनिवार को श्री शनिदेव का तैलाभिषेक करें
* शिव के ही अंश बटुक भैरव की आराधना से भी इस दोष से बचाव हो सकता है।
* प्रथम पूज्य शिव पुत्र श्री गणेश को विघ्रहर्ता कहा जाता है। इसलिए कालसर्प दोष से मुक्ति के लिए गणेश पूजा भी करनी चाहिए।
* एक वर्ष तक गणपति अथर्वशीर्ष का नित्य पाठ करें।

गुरुवार, ५ मे, २०१६

अमावस्या के चमत्कारी उपाय


अमावस्या हिन्दु पंचांग के अनुसार माह की 30 वीं और कृष्ण पक्ष की अंतिम तिथि होती है उस दिन आकाश में चंद्रमा दिखाई नहीं देता, रात्रि में सर्वत्र गहन अन्धकार छाया रहता है । इस दिन का ज्योतिष एवं तंत्र शास्त्र में अत्यधिक महत्व हैं। तंत्र शास्त्र के अनुसार अमावस्या के दिन किये गए उपाय बहुत ही प्रभावशाली होते है और इसका फल भी अति शीघ्र प्राप्त होता है। पितृ दोष हो या किसी भी ग्रह की अशुभता को दूर करना हो, अमावस्या के दिन सभी के लिए उपाय बताये गए है । आपकी आर्थिक, पारिवारिक और मानसिक सभी तरह की परेशानियाँ इस दिन थोड़े से प्रयास से ही दूर हो सकती है।
हर अमावस्या को घर के कोने कोने को अच्छी तरह से साफ करें, सभी प्रकार का कबाड़ निकाल कर बेच दें। इस दिन सुबह शाम घर के मंदिर और तुलसी पर दिया अवश्य ही जलाएं इससे घर से कलह और दरिद्रता दूर रहती है ।

अमावस्या पर तुलसी के पत्ते या बिल्व पत्र बिलकुल भी नहीं तोडऩा चाहिए। अमावस्या पर देवी-देवताओं को तुलसी के पत्ते और शिवलिंग पर बिल्व पत्र चढ़ाने के लिए उन्हें एक दिन पहले ही तोड़कर रख लें।

धन लाभ के लिए अमावस्या के दिन पीली  त्रिकोण आकृति की पताका विष्णु मन्दिर में ऊँचाई वाले स्थान पर इस प्रकार लगाएँ कि वह लगातार लहराती रहे, तो आपका भाग्य शीघ्र ही चमक उठेगा। लगातार स्थाई लाभ हेतु यह  ध्यान रहे की झंडा वहाँ लगा रहना चाहिए। उसे आप समय समय पर स्वयं बदल भी सकते है।

हर अमावस्या को गहरे गड्ढे या कुएं में एक चम्मच दूध डालें इससे कार्यों में बाधाओं का निवारण होता है । इसके अतिरिक्त अमावस्या को आजीवन जौ दूध में धोकर बहाएं,  आपका भाग्य सदैव आपका साथ देगा ।

अमावस्या के दिन शनि देव पर कड़वा तेल, काले उड़द, काले तिल, लोहा, काला कपड़ा और नीला पुष्प चढ़ाकर शनि का पौराणिक मंत्र "ऊँ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तण्डसंभुतं नमामि शनैश्चरम।" की एक माला का जाप करने से शनि का प्रकोप शांत होता है , एवं अन्य ग्रहों के अशुभ प्रभावों से भी छुटकारा मिलता है । हर अमावस्या को पीपल के पेड़ के नीचे कड़वे तेल का दिया जलाने से भी पितृ और देवता प्रसन्न होते हैं।

प्रत्येक अमावस्या को गाय को पांच फल भी नियमपूर्वक खिलाने चाहिए, इससे भी घर में शुभता एवं हर्ष का वातावरण बना रहता है ।

अमावस्या के दिन किसी सरोवर पर गेहूं के आटे की गोलियां ले जाकर मछलियों को डालें। इस उपाय से पितरों के साथ ही देवी-देवताओं की कृपा भी प्राप्त होती है, धन सम्बन्धी सभी समस्याओं का निराकरण होता है।

अमावस्या के दिन सुबह ब्रह्म मुहूर्त में उठकर नित्यकर्मों से निवृत्त होकर पवित्र होकर जो व्यक्ति रोगी है उसके कपड़े से धागा निकालकर रूई के साथ मिलाकर उसकी बत्ती बनाएं। फिर एक मिट्टी का दीपक लेंकर उसमें घी भरकर, रूई और धागे की बत्ती लगाकर यह दीपक हनुमानजी के मंदिर में जलाएं और हनुमान चालीसा का पाठ करें। इस उपाय से रोगी की तबियत जल्दी ही सुधरने लगती । यह उपाय उसके बाद कम से कम 7 मंगलवार और शनिवार को भी नियमित रूप से करना चाहिए।

अमावस्या के दिन एक कागजी नींबू लेंकर शाम के समय उसके चार टुकड़े करके किसी भी चौराहे पर चुपचाप चारों दिशाओं में फेंक दें। इस उपाय से जल्दी ही बेरोजगारी की समस्या दूर हो जाती है।

अमावस्या की रात्रि में 8 बादाम और 8 काजल की डिबिया काले कपडे में बांध कर सिंदूर में रखे, इससे शीघ्र ही आर्थिक समस्याओं का समाधान होता है । 

अमावस्या के दिन क्रोध, हिंसा, अनैतिक कार्य, माँस, मदिरा का सेवन  एवं  स्त्री से शारीरिक सम्बन्ध, मैथुन कार्य आदि का निषेध बताया गया है, जीवन में स्थाई सफलता हेतु इस दिन इन सभी कार्यों से दूर रहना चाहिए ।

अमावस्या पर पितरों की तृप्ति के लिए विशेष पूजन करना चाहिए। यदि आपके पितृ देवता प्रसन्न होंगे तभी आपको अन्य देवी-देवताओं की कृपा भी प्राप्त हो सकती है। पितरों की कृपा के बिना कठिन परिश्रम के बाद भी जीवन में अस्थिरता रहती है, मेहनत के उचित फल प्राप्त नहीं होती है ।

हर अमावस के दिन एक ब्राह्मण को भोजन अवश्य ही कराएं। इससे आपके पितर सदैव प्रसन्न रहेंगे, आपके कार्यों में अड़चने नहीं आएँगी, घर में धन की कोई भी कमी नहीं रहेंगी और आपका घर -  परिवार को टोने-टोटको के अशुभ प्रभाव से भी बचा रहेगा।

पितृ दोष निवारण के लिये यदि कोई व्यक्ति अमावस्या के दिन पीपल के पेड़ पर जल में दूध , गंगाजल, काले तिल, चीनी, चावल मिलाकर सींचते हुए पुष्प, जनेऊ अर्पित करते हुये  “ऊँ  नमो भगवते वासुदेवाएं नमः" मंत्र का जाप करते हुये 7 बार परिक्रमा करे तत्पश्चात्  ॐ पितृभ्यः नमः मंत्र का जप करते हुए अपने अपराधों एवं त्रुटियों के लिये क्षमा मांगे तो पितृ दोष से उत्पन्न समस्त समस्याओं  का निवारण हो जाता है। और अगर सोमवती अमावस्या हो तो पीपल की 108 बार परिक्रमा करने से विशेष लाभ मिलता है ।

हर अमावस्या पर पितरों का तर्पण अवश्य ही करना चाहिए । तर्पण करते समय एक पीतल के बर्तन में जल में गंगाजल , कच्चा दूध, तिल, जौ, तुलसी  के पत्ते, दूब, शहद और सफेद फूल आदि डाल कर पितरों का तर्पण करना चाहिए। तर्पण, में तिल और कुशा सहित जल हाथ में लेकर दक्षिण दिशा की तरफ मुँह करके तीन बार तपरान्तयामि, तपरान्तयामि, तपरान्तयामि कहकर पितृ तीर्थ यानी अंगूठे की ओर जलांजलि देते हुए जल को धरती में किसी बर्तन में छोड़ने से पितरों को तृप्ति मिलती है। ध्यान रहे तर्पण का जल तर्पण के बाद किसी वृक्ष की जड़ में चड़ा देना चाहिए वह जल इधर उधर बहाना नहीं चाहिए। 

शास्त्रो के अनुसार प्रत्येक अमावस्या को पित्तर अपने घर पर आते है अतः इस दिन हर व्यक्ति  को यथाशक्ति उनके नाम से दान करना चाहिए।  इस दिन बबूल के पेड़ पर संध्या के समय पितरों के निमित्त भोजन रखने से भी पित्तर प्रसन्न होते है।

पितरों को खीर बहुत पसंद होती है इसलिए प्रत्येक माह की अमावस्या को खीर बनाकर ब्राह्मण को भोजन के साथ खिलाने पर महान पुण्य की प्राप्ति होती है, जीवन से अस्थिरताएँ दूर होती है। इस दिन संध्या के समय पितरों के निमित थोड़ी खीर पीपल के नीचे भी रखनी चाहिए ।

अमावस्या के दिन काले कुत्ते को कड़वा तेल लगाकर रोटी खिलाएं। इससे ना केवल दुश्मन शांत होते है वरन आकस्मिक विपदाओं से भी रक्षा होती है ।

अमावस्या के दिन अपने घर के दरवाजे के ऊपर काले घोड़े की नाल को स्थापित करें। ध्यान रहे कि उसका मुंह ऊपर की ओर खुला रखें। लेकिन दुकान या अपने आफिस के द्वार पर लगाना हो तो उसका खुला मुंह नीचे की ओर रखें। इससे नज़र नहीं लगती है और घर में स्थाई सुख समृद्धि का निवास होता है ।

अमावस्या की तिथि को कोई भी नया कार्य, यात्रा, क्रय-विक्रय तथा समस्त शुभ कर्मों को निषेध कहा गया है, इसलिए इस दिन इन कार्यों को नहीं करना चाहिए  ।

वैसे तो सभी अमावस्या का महत्व है लेकिन सोमवार एवं शनिवार को पड़ने वाली अमावास्या विशेष रूप से पवित्र मानी जाती है। इसके अतिरिक्त मौनी अमावस्या और सर्वपितृ दोष अमावस्या अति महत्वपूर्ण मानी गयी है।

"श्री स्वामी समर्थ " हा मंत्र  कोणतीही सेवा  अथवा तोडगा सुरू करतांना दररोज ३, ५, ७, ९, ११,२१,५१, या विषम अंकी अंकात माळ जपावी व नंतर तोडगा सुरू करावा किंवा सेवा सुरू करावी. "श्री स्वामी समर्थ "