गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

'मेड फॉर इच अदर'


कागदावर जुळलेली पत्रिका आणि
काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहातं.
लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं
जवळ-जवळ अशक्य आहे., हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुख:, प्रेम-भांडणाचे, काळे-पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवण हीच तर नियतीची जुनी हौस आहे.
सरळ सोप आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून
संसारात पाऊल टाकायचं असतं.
निसर्गात १ पान दुसऱ्या पानासारखे
नाही, तर तुला मिळणारा 'जीवन-
साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा? ...... त्याचे आपले काही गुण जुळणारे नसणारच, ते तू स्वीकारणार असशील, त्या
वेगळ्या तुला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असशील तरच संसारात पाऊल टाक ---
अशा आशयाचं समुपदेशन हि काळाची गरज आहे कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा, बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा
मारताना छंद ,महत्त्वाकांक्षा , श्रद्धा-
अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा, या प्रश्नांची उत्तरं हि सौंदर्य-स्पर्धेतील तात्पुरत्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.
लग्नानंतर एकमेकांना कळतं, तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे'- पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडल नाही बयेन.
जाब विचारू शकतो आपण ?
किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची
आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग कराव - असं स्वप्न आहे !!! पण
प्रत्यक्षात कळत; कामावरुन आला , कि
जो सोफ्यावर लोळतो - गव्हाचं पोतं जसं.
पान घेतलेत ---हे हि चारदा सांगाव लागत.
प्रवासाची आवड कसली ? - कामावर जाऊन घरी परत येतो नशीब .
वर्षभर सांगतेय , माथेरानला जाऊ - तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो. कसले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते
कळले असते तर........
.......न जुळलेल्या गुणांशीच खर तर लग्न असत. तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली. नाही जमलं कि विस्कटली ...... अन्याय -शोषण सहन न करणं , हा पहिला भाग झाला ---- पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन -- नात जुळतंय का हे पाहण्याची
सहनशीलता दोघांमध्ये हवी .
आज हे स्त्री -पुरुषांना प्राण पणाने
सांगितलंच जात नाहीये ; नाही जुळलं -
मोडा ;
व्हा विभक्त - आणि मग करा काय??
आपल्याला 'हवी तशी ' व्यक्ती मिळणं हे १ परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडत ठेवावं लागतं ---- हेच एक सत्य आहे.
धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुल फुलणार ?
एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?
या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वतःशी
देऊनच संसार मांडायला हवा.
आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या
व्यक्तीच वेगळेपण सहज स्वीकारणं हे या
वाटेवरच पाहिलं पाऊल...... ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं कि इतर सहा पावलं सहज
पडत जातात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा