सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

संगत

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना
सहज विचारले-

"देवा सत्संग सत्संग म्हणतात
त्याचा एवढा काय हो महिमा"?
.
यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता
.
एका किटकाचा निर्देश करून सांगितले कि
तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.
.
नारद मुनी त्या किटकाला शोधत
नरका पर्यंत गेले आणि
त्यांनी त्या किटकाला विचारले-
"सत्संगा चे काय फळ आहे तुला माहित आहे का?"
.
कीटका ने त्यांचे कडे एक कटाक्ष टाकला
आणि तो मृत झाला.
.
प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने
ते पुन्हा श्रीकृष्णा कडे आले म्हणाले
देवा तो कीटक तर काही बोलल्या
विनाच मृत झाला आता
तुम्हीच उत्तर सांगा.
.
देवांनी नारदां चे म्हणणे ऐकून घेतले
आणि ते म्हणाले "तेथे पहा त्या समोरच्या
झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले
पोपटाचे पिलू आहे
ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल."
.
नारदमुनी त्या पोपटाचे पिला जवळ गेले
आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला.
.
पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून
त्यांचे कडे पहिले आणि
त्याने डोळे मिटले ते कायमचेच.
.
नारद मुनी मनाशीच विचार करू लागले
काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे.
.
कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला?
ते मृत्यू पावले.
.
अत्यंत दुखी होहून ते पुन्हा श्रीकृष्णा पाशी आले.
म्हणाले "देवा आपलाल्या सांगायचे नसेल
तर नका सांगू नका
पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय
ते मृत होत आहेत -
अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे
धनी मला करणार आहात"
.
तेंव्हा देव त्यांना म्हणाले "
त्याची चिंता तू करू नकोस
तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल
तर ते पहा नुकत्याच तिथे एका गाईने बछड्या ला
जन्म दिलाय
तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल."
.
दुखी अन्त: कारणाने नारदांनी तेथे जावून
.
त्या बछड्या च्या कानाशी लागून
त्यालाही तोच प्रश्न केला;
.
त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पहिले
आणि ते तेथेच लुढकले.
.
नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले
तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून
श्रीकृष्ण म्हणाले
.
"राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे
त्याचे कडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल."
.
नारदांनी विचार केला आता पर्यंत
कीटक पोपट व बछड्या चे मृत्यू ने
माझ्यावर काही आपत्ती आली नाही
पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले
तर माझे प्राणही संकटात येवू शकतात.
.
तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमारा कडे गेले
आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले
आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच
त्याचे कानात विचारले-
.
सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो ?
.
प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला
आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात.
.
आहो आपण पहिल्यांदा मला भेटला
.
तेंव्हा मी कीटक होतो
आपण मला हा प्रश्न विचारला
आणि मी मेलो
आणि पोपट झालो ;
.
नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो
आणि मला बछड्या चा देह प्राप्त झाला ;
.
पुन्हा आपले दर्शन घडले
आणि बछड्या चा देह पडून
.
सर्व देहा मध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला
.
आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले ;
.
हे सर्व आपल्या सारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे. .
ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो
ते धन्य आहेत.
.
नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले
व सत्संगाचा महिमा हि कळाला,
.
ते देवांकडे आले आणि म्हणाले
"देवा जशी आपली लीला अगाध
तशीच आपली समजावून देण्याची पद्धत
हि दीव्य आहे "
.
.
म्हणून मित्रांनो जिवन जगताना
संगत ही खुप महत्वाची आहे
.
बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर
.
बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून जातात
.
या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर
.
लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो
.
ज्या प्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला
.
श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वोश्रेष्ठ योद्धा झाला
.
याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म ,
कर्ण सर्वोश्रेष्ठ असुन ही त्याचा नाश झाला
.
आपण ज्या सोबत रहातो त्याच्या विचारांचा,
रहाणीचा, वागणीचा, अंमल
हा आपल्यावर होत असतो.
.
संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात
.
संगत कशी हवी याचा विचार करावा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा