शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

बेगडी व्यक्ती पूजा आणि रियल लाईफ हिरो…   प्रमोद गायकवाड, सोशल नेट्वर्किंग फोरम

 
��������������������
व्यक्ती पूजेच्या बाबतीत भारताचा हात अख्ख्या जगात कुणी धरू शकेल असे मला वाटत नाही. 
परवाचीच घटना ….सियाचीन सीमेवर  देशाचे संरक्षण करताना 10 सैनिक हिमस्खलनात गाडले गेले. सहा दिवस भारतीय सैनिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण 9 जवान शहीद झाले. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे त्यातील लान्स नायक हनुमंथप्पा सहा दिवसानंतरही बर्फाखाली जिवंत सापडले. त्यानंतर त्यांना दिल्लीत उपचारार्थ आणले गेले पण दुर्दैवाने आज त्यांचंही निधन झालं. संपूर्ण देशाला या जवानांच्या कुटूंबीयांची चिंता वाटावी आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या जवानांचा अभिमान वाटावा अशी ही घटना.….  पण परवा झाले काय कि पंतप्रधानांनी जांबाज जवान हनुमंथप्पांना हॉस्पीटलला भेटायला जात असल्याचे ट्वीट केले आणि एका सेकंदात या घटनेचा हिरो बदलला गेला. प्राणांची बाजी लावत मायनस २०-२५ सेल्सिअस तापमानात अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांपेक्षा बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये बघायला जाणाऱ्या मोदींचा जास्त अभिमान वाटून गेला. यासंदर्भात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लान्स नायक हनुमंथपांचा फक्त उल्लेख करून मोदींवर मात्र स्तुती सुमने उधळली जात होती. वाचून वाईट तर वाटलेच पण आपल्या देशाला लाभलेल्या या व्यक्ती पूजेच्या शापातून मुक्तता व्हावी असे तीव्रतेने वाटून गेले. या घटनेत मोदींची चूक आहे असे नाही पण अतिउत्साही समर्थक मात्र आपल्या नेत्याच्या अतिप्रेमापोटी असे उद्योग करतात.   
खरे म्हणजे व्यक्ती पूजेत काँग्रेस पक्ष सर्वोच्च स्थानी असला तरी अन्य पक्षही मागे आहेत असं अजिबात नाही. सर्वच राष्ट्रीय आणि प्रांतीक पक्षांचे चेले आपापल्या नेत्यांनी भ्रष्टाचार करो, अत्याचार करो, गुंडगीरी करो, काहीही करो... त्यांचे समर्थन करण्यात आजिबात मागे रहात नाहीत. दक्षीणेत तर भाट कार्यकर्ते आपल्या नेत्यांची मंदिरेसुद्धा बांधतात. जवळपास सर्वच नेते प्रसिद्धीचा झोत आपल्यावर राहिल हे बघण्यात दक्ष असतात.  भाजपही याच वाटेवरील प्रवासी बनलाय. विशेषतः मोदीप्रेमी आपण या व्यक्ती पूजेत मागे रहायला नको याची पुरेपूर काळजी घेताना दिसतात.
याघटनेतून सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करताना निदान कोणत्या वेळी कुणाची स्तुती करावी याचे भान आपण सर्वांनी नक्कीच पाळायला शिकले पाहिजे. 
लान्सनायक हनुमंथप्पा यांच्यासह शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ����������
सोबतच जबाबदार भारतीय म्हणून व्यक्तीपुजेचं स्तोम अशा प्रसंगी तरी माजवू नये ही सोशल नेटवर्कर्सला विनंती..! 
अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत या जवानांना वाचविण्याचे प्रयत्न करणार्या भारताच्या सर्व रिअल लाईफ हिरोंना कडक सलाम करायलाच हवा…! 
����जय जवान जय किसान����

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा