शनिवार, २ जानेवारी, २०१६

वर्ष येतात नि जातात

वर्ष येतात नि जातात,
वर्षाचा शेवटचा दिवस आला कि, "गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं...?" याचा हिशोब लावायला सुरुवात होते.
गेलेल्या वर्षात खूप काही झालं, खूप काही मिळालं, खूप काही गमावलं...
आता जे कमवलं किंवा जे गमावलं, त्याला "खूप" कसे म्हणता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
नवीन माणसं भेटली "जीव" बनली, काही "जीव" लावलेली माणसं दुरावली..
काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास ठरले.
जे चांगलं होतं, मनापासून हवं होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय त्याची किंमत ठेवायची, मिळालंय ते जपून ठेवायचं...
"सगळेच नशीबवान नसतात, आपण नशीबवान निघालो"
असे म्हणून आयुष्याचे आभार मानून मिळालेलं टिकवून ठेवायचं...
कारण
आयुष्य आपल्याला "मिळवून द्यायचं" काम करतं. ते जपणं आपल्या हातात असतं..
आपण चालायचे थांबतो पण आपण थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का...?
नाही, त्यांची टिकटिक चालूच राहते "वेळ थांबत नसतो"...
"दु:ख मनाच्या कुपीत बंद करायचं आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं"
.          ������������
           अँड.सुरेन्द्र सोनवणे, नाशिक                   http://sainikdarpan.blogspot.in/
      http://adharvad.blogspot.in                         ������  �� �� ��  ������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा