आन्टनी लैरीस त्याचं नाव. त्याच्या फ्रेंच नावाचा उच्चार करणंही महाकठीण. पण परवाच्या पॅरीस हल्ल्यात अतिरेक्याच्या गोळयांना त्याची बायको - हेलन बळी पडली आणि त्यानं आपल्या बायकोला जीवे मारणा-या अतिरेक्याला उद्देशून फेसबुकवर ही पोस्ट लिहिली, पेटत्या उरानं हे शब्द उच्चारणं तितकंच कठीण आहे.
लैरीस लिहतो –
तुला कळलंय का,
शुक्रवारी रात्री तू संपवलं आहेस,
एक आगळं वेगळं आयुष्य ..
ती माझ्या प्रेमाची जितीजागती मूर्ती होती
माझ्या लहानग्याची मायाळू ‘ममा’ होती…
पण तरीही,
माझ्या मनात तुझ्यासाठी
लवलेशही नाही द्वेषाचा ..!
मला नाही माहीत कोण आहेस तू ?
आणि खरं सांगू,
मला ते जाणून ही घ्यायचं नाही ऽ
आत्म्याचं थडगं झालंय ज्यांच्या
त्यांना असते का काही नाव गाव ?
वेडया,
तू जेव्हा बेधुंद चालवित होतास ,
तुझ्या निर्दयी गोळया
माझ्या प्रियेच्या देहावर
तेव्हा,
तुझ्या प्रत्येक गोळीसरशी
जखमी होत होता तुझा खुदा
रक्ताळत होते त्याचे ह्रदय ,
ज्याने स्वतःच्या प्रतिमेबरहुकूम
बनविले होते तुला …!!!
द्वेष आणि सूडाची भेट
तरीही,
मी देणार नाही तुला..!
अजिबात नाही..!!
मला आहे ठावे,
तुला हीच भेट हवी आहे.
पण तुझ्या आंधळया द्वेषाला
पांगळया रागाने प्रत्युत्तर देण्याचा
अडाणीपणा मी करणार नाही,
मी नाही जाणार बळी
तिरस्काराच्या या वेडगळ वणव्यात ..!
तुला घाबरावयाचे आहे मला,
तुला वाटते,
मी पाहवे संशयाने
माझ्या प्रत्येक देशबांधवाकडे
आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी
मी ओलिस ठेवावे माझे स्वातंत्र्य ..
सॉरी,
असे काहीच नाही होणार,
हरला आहेस तू …!
अरे,
रात्रंदिवस मी वाट पाहत होती तिची
आणि
अखेरीस आज सकाळी मी पाह्यलं तिला.
तुला सांगू,
बारा वर्षांपूर्वी मी तिला पहिल्यांदा पाहयलं
आणि वेडयासारखा तिच्या प्रेमात पडलो,
त्या क्षणाची आठवण झाली…
तुझ्या गोळयांनी देहाची चाळण झालेली असतानाही
आजही ती तेवढीच सुंदर दिसत होती रे…
माझं चिमुकलं जग उध्वस्त झालंय
मानायचाच असेल तर,
हाच तुझा थोडासा विजय..!
पण माझी ही वेदना फार काळ टिकणार नाही
कारण
मला पक्के ठावे आहे,
ती सदैव माझ्यासोबतच असणार आहे
आणि
आम्ही पुन्हा विहरत राहू
आमच्या अनोख्या प्रेमाच्या नंदनवनात,
जिथे तुला पाऊल टाकायलाही बंदी आहे.
आता आम्ही दोघेच आहोत
मी आणि माझा लहानगा मेल्वील
अवघ्या सतरा महिन्यांचा आहे तो..!
पण लक्षात ठेव,
जगातल्या कोणत्याही सैन्याहून
बलशाली आहोत आम्ही बापलेक..!
तुझ्याकडे लक्ष दयायला वेळच नाही माझ्याकडे,
दुपारच्या झोपेतून आता जागा होईल माझा पोर
मला भरवायचे आहे त्याला
मग
आम्ही बापलेक खेळायला जाऊ…
आणि हो,
हा माझा चिमुकला मेल्वील
असाच मोकळा ढाकळा राहिल
पाखरासारखा
आनंदी असेल
गोजि-या फुलपाखरासारखा
आणि
तुझ्या काळजावर
उमटत राहिल भितीचा थरकाप
कारण
त्याच्याही मनात तुझ्यासाठी
द्वेषाचा लवलेशही नसेल.
( भावानुवाद – डॉ प्रदीप आवटे )
_________________________-
प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या.... लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही.
.......... एक मुंबईकर.
प्रिय मुंबईकरानो , आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची; Platform वर सारखं वाकून बघितल्याने Train लवकर येत नाही !
.........एक पुणेकर.
आणि प्रिय मुंबई आणि पुणेकरांनो एक लक्षात ठेवा.....चितळे चे दुध आणि जंबो वङापाव खाऊन बाॅङी बनत नाही ! त्याच्या साठी वरणबट्टी, वांग्याची सणसणित घोटलेली भाजी व नाका तोंडातून पाणी काढणारी मिसळच खावी लागेल!
.......... एक जळगांवकर
दोन मित्र असतात दोघांची परीस्थिती समान असते...
पहिला असतो तो व्यवसाय सुरू करतो.
आणि
तो आपल्या व्यवसायात खूप यशस्वी होतो. भरपूर संपत्ती मिळवितो.
दुसरा असतो तो नोकरी करत असतो .
दोघांतील परीस्थितीचे वर्णन केलं.
तर,
कुठे इंद्राचा ऐरावत...
आणि
कुठे गागा भट्टाची तट्टानी अशी होती.
एक दिवस अचानक श्रीमंत मित्राला व्यवसायात तोटा होतो.
मग बॅक गॅरंटी साठी दोन कोटी रुपये दोन दिवसांत जमा करावयाचे असतात.
श्रीमंत मित्र खूप चिंतेत असतो.
एवढी रक्कम तो जमा करू शकत नाही.
दुसर्या मित्राजवळ जेव्हा तो जातो तेव्हा तो विचारतो काही अडचण आहे का...???
परंतु,
खूपदा विचारून सुद्धा श्रीमंत मित्र त्याला काही सांगत नाही.
कारण,
त्याला माहीत असतं की याला सांगून तरी काय फायदा...!!!
कारण,
याची काही एवढी ऐपत नाही.
खूप वेळा नंतर श्रीमंत मित्र त्याला आपली अडचण सांगतो.
दुसरा मित्र मग एक फोन करून सांगतो की अमुक अमुक बॅकेत अमुक अमुक खात्यात दोन कोटी रुपये जमा कर.
मग,
पहिला मित्र म्हणतो हे बघ भलत्या वेळी विनोद करू नको.
दुसरा मित्र म्हणतो जारे तुझी अडचण दूर झालेली आहे.
त्यानंतर दोन दिवसांनी त्याला कळते की आपल्या खात्यात दोन कोटी रुपये जमा केलेले आहेत.
हे कसे काय शक्य झाले असे
पहिला मित्र विचारातो.
त्त्यानंतर दुसरा मित्र म्हणतो...
अरे मित्रा...
तू ज्यावेळी पैसे मिळवत होतास त्त्यावेळी मी मित्र मिळवत होतो...
जीवनात दोनच मित्र कमवा...
☺एक श्रीकृष्णा सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करता ही तुम्हाला विजयी करेल.
आणि
दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असताना ही तुमच्यासाठी युद्ध करेल.
This msg for only best lovely friends...
☺☺
[18:47, 19/11/2015] G Nitin Chavan ४0 Gaon: सरली म्हणतात तरी..
दारातल्या विस्कटल्या रांगोळीत..
थोडीशी अजून उरली आहे दिवाळी
लाडू चकलीच्या अर्ध्या भरल्या डब्यात
आणखी खमंग मुरली आहे दिवाळी
.
व्हरांड्यातल्या फिकटल्या कंदिलात
अजूनही हलकेच झुलते आहे दिवाळी
दारात तेवणा-या पणतीच्या ज्योतीत
अजूनही प्रकाश घेऊन डुलते आहे दिवाळी
.
घडी मोडल्या कपड्यांच्या पहिल्या सुरकुतीत
अजूनही नवी कोरी चुरली आहे दिवाळी
लक्ष लक्ष ज्योती उजळून
अजूनही मनात मी भरली आहे दिवाळी
.
सरली म्हणतात तरी..
अजूनही उरली आहे.. दिवाळी
अजूनही उरली आहे.. दिवाळी
रोने से आंसू भी पराये हो जाते है...
लेकिन मुस्कराने से पराये भी अपने हो जाते है..!!!
मुझे वो रिश्ते पसंद है,
जिनमें "मैं" नहीं "हम" हो ।
...: किसी ने हम से पुछा इतने छोटे से दिल मे इतने सारे दोस्त कैसे समां जाते है.... ...............................
.............हम ने कहा वैसे ही जैसे
छोटी सी हथेली मे सारे जिंदगी
की लकीरें समां जाती है..
बस इतना दो प्रभू...
कि जम़ीन पर बैठूँ तो....
...लोग उसे मेरा
बडप्पन कहें, औकात नहीं..!
_________-_-
आँफिस मधील खुर्ची पेक्षा..
माझ्या शाळेचा बाकच बरा होता...
कामाच्या या व्यापा पेक्षा..
आमचा गृहपाठच बरा होता...
काँम्प्युटरची 'स्क्रीन' कितीही प्रीय असली..
तरी माझ्या शाळेचा 'फळाच' बरा होता...
बाॅसच्या सततच्या टेन्शन पेक्षा..
बाईंच्या छडीचा मारच बरा होता..
मोबाईल वरील रग्गड गेम पेक्षा..
मैदानी खेळाचा थाटच बरा होता..
आलो शहरात सुख मिळविण्यासाठी..
पण गड्या आपला गावच बरा होता... गावच बरा होता...
मुलांचे विनोद :
शिक्षकाने विचारलं, बहुतांश दक्षिण भारतीय लोक काळेसावळे का असतात?
नन्या उत्तरला, कारण ते लोक सन स्क्रिन लोशन न लावता सारखे 'सन टीव्ही', 'सूर्या टीव्ही', 'उदय टीव्ही' पाहात असतात ना म्हणून!
----------
मुलांचे विनोद :
आई- बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं. तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास.
बाळू- आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं, की फुलं तोडण्यास सख्त मनाई
___-_-----------------------
मनाला स्पर्श करणारी कविता) .......
फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...
प्लीज!
आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा,
मीच का एसएमएस करु,
आणि कधीतरी जिवाभावाचं माणूस अशा ठिकाणी
निघून जातं,
जिथे नेटवर्क पोहचत नाही,
आपलं माणूस नॉट रिचेबल होण्यापूर्वी,
एक फोन कराल त्यांना..
प्लीज..!
आपण असतो फार बिझी,
वेळचं नाही,
कुठं जायला फुरसत नाही,
जिवाभावाची माणसं आठवतसुद्धा नाहीत,
आपण कधी पत्र लिहित नाही,
ख्यालीखुशाली विचारत नाही,
त्यांचे बर्थडे आपल्याला आवडत नाही,
त्यांच्या आठवणींनी मन काहूर करत नाही..
आणि मग एक दिवस येतो निरोप,
ते 'नसल्याचा'..
आणि जातो फक्त दारावर,
कधीही न होणाऱ्या भेटीसाठी..
असं होण्यापेक्षा
कधीतरी पाच मिनिट वेळ काढता नाही का येणार,
थोडा वेळ भेटून गप्पा मारता नाहीच का येणार..
प्लीज.. त्या गप्पांना वेळ द्याच..
प्लीज..
हे सारं कळतं आपल्याला,
पटतंही..
मात्र तरीही आपण आपल्याच आयुष्यात
बांधलेले,
आपले दोर काचलेले..
त्या काचल्या दोरांपायी
कुणाशी शेवटची भेट झाली नाही
असं होऊ नये..
आणि जिवंत असलेली माणसं कायमची दुरावू नये,
म्हणून एकदाच..
मनापासून हाक माराल प्लीज..
आपल्या माणसांना..........॥
〰〰〰〰〰〰〰〰
दोस्ती बड़ी मुश्किल से बनती हैं,
पर दुश्मनी में वक़्त नहीं लगता।
गुज़र जाती है उम्र रिश्ते बनाने में,
पर बिगड़ने में वक़्त नहीं लगता।
जो कमाता है महीनों में आदमी,
उसे गंवाने में वक़्त नहीं लगता।
पल पल कर उम्र पाती है ज़िंदगी,
पर मिट जाने में वक़्त नहीं लगता।
जो उड़ते हैं अहम के आसमानों में,
जमीं पर आने में वक़्त नहीं लगता।
हर तरह का वक़्त आता है ज़िंदगी में,
वक़्त के गुज़रने में वक़्त नहीं लगता।
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा