सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा माहिती

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा माहिती

दि 31-10-2016 रोज सोमवार बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतॊ. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या व सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

बलिप्रतिपदेला भगवान विष्णुंच्या वामन अवताराची पूजा करतात. बळी हा असुर राजा होता. त्याला त्याच्या पदाचा खूप गर्व झाला होता त्याला त्याच्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठीच भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याला पाताळ लोकी पाठविले. काही समाज कंटक श्री विष्णुंच्या वामनावताराने गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणतात परंतु शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम हा आहे त्याची हत्यारे सुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहे.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी
अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र
काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे
म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात
कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा
करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली
जाते. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी
विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त
आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही
नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून
व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या
कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या
नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता
वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला
औक्षण करते व पती पत्‍नीला ऒवाळणी घालतो.
नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात.
ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो
त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच
असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो
शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ
नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल
तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा
भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा
लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे
म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले,
‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे
आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी
वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व
पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने
‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा
म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय
त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून
वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे
त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व
राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले
टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य
म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्‍याला यमयातना होऊ
नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास
करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि
कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

लक्ष्मी पूजनासाठी शास्त्र संमत अशी नक्की वेळ कोणती ?*

*लक्ष्मी पूजनासाठी शास्त्र संमत अशी नक्की वेळ कोणती ?*

दिवाळीत आश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन नक्की कधी व कोणत्या वेळी करावे याविषयी अनेक प्रकारे संभ्रम उत्पन्न करणारे संदेश पसरविले जात असतात. धर्मशास्त्रानुसार विचार केल्यास दिवाळीतील अमावस्येस करण्यात येणारे लक्ष्मी पूजन हे फक्त प्रदोषकाळातच करावे असे सांगितलेले आहे. पुराणात स्पष्ट सांगितले आहे "दीपान्दत्वा प्रदोषे तु लक्ष्मीं पूज्य यथाविधि" अर्थात प्रदोषकाळातच लक्ष्मीपूजन करावे.
प्रदोषकाळ म्हणजे सूर्यास्तानंतरच्या ६ घटिका म्हणजे अंदाजे २ तास २४ मिनिटांचा कालावधी होय.या प्रदोषकाळातच म्हणजे *सायंकाळी अंदाजे ६.०० ते सायंकाळी ८.३०* या वेळेतच लक्ष्मी पूजन करावे.लक्ष्मी पूजनासाठी लाभ,अमृत,शुभ या प्रकारचे चौघडिया मुहूर्त पाहू नयेत .चौघडिया मुहूर्त हा फक्त यात्रेसाठी बघायचा असतो पण हल्ली सर्रास तो लक्ष्मी पूजनासाठी घेतला जात आहे,जे योग्य व धर्मशास्त्रसंमत नाही.तसेच लक्ष्मीपूजनासाठी राहुकाळ, स्थिरलग्न, अभिजित् मुहूर्त यांसारख्या  बिनबुडाच्या गोष्टी बघू नयेत. *प्रदोषकाळातच लक्ष्मी पूजन करावे व देवी लक्ष्मीची कृपा संपादन करावी*

*सूर्यसिद्धांतीय पंचांगकर्ते*:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रसंमतीने *पं.गौरवशास्त्री देशपांडे-
|| *यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग* ||
|| *सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग* ||

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

!! दिपावली मुहूर्त पत्रिका !!

*IIश्री गजानन प्रसन्न II*
*IIश्री महालक्ष्मी प्रसन्न II*
शालिवाहन शके १९३८ 
विक्रम संवत-२०७२-२०७३

*!! दिपावली मुहूर्त पत्रिका !!*

*धनत्रयोदशी :*
मिती आश्विन कृष्ण त्रयोदशी शुक्रवार  दि.२८/१० २०१६ रोजी धनत्रयोदशी आहे.
शुक्रवार  दि.२८/१० २०१६       सकाळी ६=३४ ते ७=५९ चंचल
सकाळी ७=५९ ते ९=२६  लाभ
सकाळी ९=२६ ते १०=५२ अमृत
दुपारी १२=१८ ते १=४४ शुभ
दुपारी ४=३६ ते ६=०२ चंचल
रात्रौ  ९=१० ते १०=४४  लाभ
रात्रौ १२=१८ ते १=५२  शुभ
रात्रौ १=५२ ते ३=२६  अमृत

*लक्ष्मीकुबेर पूजन:*
मिती आश्विन कृष्ण अमावास्या रविवार दि,३०/१०/२०१६  रोजी लक्ष्मीकुबेर पूजन करावे.
रविवार दि,३०/१०/२०१६          सकाळी ८=०१ ते ९=२६  चंचल
सकाळी ९=२६ ते १०=५२ लाभ
सकाळी १०=५२ ते १२=१८ अमृत
दुपारी १=४४ ते ३=१० शुभ
सायंकाळी ६=०१ ते ७=३६ शुभ
रात्रौ ७=३६ ते ९=१०  अमृत
रात्रौ ९=१० ते १०=४४  चंचल
रात्रौ १=५२ ते ३=२७  लाभ
पहाटे ५=०१ ते ६=३५ शुभ
( गोरज मुहूर्त सायंकाळी ५=५७  ) { सिंह लग्न रात्रौ १=२३  ते ३=३१  }

*बलिप्रतिपदा :*
मिती कार्तिक शुक्ल प्रतिपदा शके १९३८ विक्रम संवत २०७३ सोमवार दि.३१/१०/२०१६ रोजी आहे. या दिवशीही वहीपूजन करता येते.
सोमवार दि.३१/१०/२०१६ सकाळी ६=३५  ते ८=०१ अमृत
सकाळी ९=२७ ते १०=५२ शुभ
दुपारी १=४४ ते ३=०९ चंचल
दुपारी ३=०९ ते ४=३५  लाभ
दुपारी ४=३५ ते ६=०१ अमृत
सायंकाळी ६=०१ ते ७=३५ चंचल
रात्रौ १०=४४ ते १२=१८  लाभ
रात्रौ १=५३ ते ३=२७   शुभ
**काटा लावण्यासाठी शुभ मुहूर्त **
सकाळी ६=३५  ते ८=०१  अमृत

*II शुभं भवतु II*
�� *शुभ दिपावली*��